Kashivishveshwar Temple Bhajan in five people Namasaptha will be held in 30 places 
कोकण

भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण : नियमांत राहून जपणार नामसप्ताहाची परंपरा...

मकरंद पटवर्धन

 रत्नागिरी :  सणांचा राजा श्रावण. या महिन्यात अनेक सण आणि व्रतवैकल्ये असतात. परंतु यंदा कोरोनामुळे याला फटका बसला असला तरी नामसप्ताह, संततधार, व्रतवैकल्ये यांची परंपरा जपली जाणार आहे. शासकीय नियम पाळून, एका वेळी पहार्‍यात फक्त 5 माणसांमध्ये भजन होईल. मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जाईल. जिल्हा प्रशासनाने अटी, शर्तीनुसार ही परवानगी दिल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रत्नागिरी परिसरात सुमारे 30 ठिकाणी अशा प्रकारे नामसप्ताह साजरे होणार आहेत.


दीप अमावस्येनंतर लागणार्‍या श्रावण महिन्यात मांसाहार, मद्य वर्ज्य मानून उपवास, व्रतवैकल्ये, सोवळे मोठ्या प्रमाणात पाळले जाते. नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला (दहीहंडी) आदी सण समारंभ श्रावणात साजरे होतात. यंदा कोरोनामुळे या सणांना ब्रेक लागणार अशी स्थिती होती. परंतु रत्नागिरी परिसरातील विविध मंदिर संस्थांनी उच्च व तंत्रशिक्षणंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यावेळी चर्चेनुसार अटी, शर्तींवर उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळाली. उत्सवांसाठी समिती नेमली असून यामध्ये अ‍ॅड. अविनाश तथा भाऊ शेट्ये, अ‍ॅड. आदेश चवंडे, दिनेश सावंत, रूपेंद्र शिवलकर, प्रसाद तथा बापू गवाणकर, मुन्नाशेठ सुर्वे आदींचा समावेश आहे.

हेही वाचा- खरे आकडे लपावणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी केंद्राकडे मागितली हजारो कोटींची मदत : निलेश राणे यांनी समोर आणली वस्तुस्थिती -
रत्नागिरी, संगमेश्‍वरसह अन्य तालुक्यांत नामसप्ताहाचे आयोजन केले जाते. ग्रामस्थांनी सामंजस्याने व आरोग्याचा विचार करून सहभाग घ्यावा, असे आवाहन देवस्थानने केले आहे. मंदिरात होणारे पहारे अर्थात आळीपाळीने भजन सेवा करण्यासाठी प्रत्येक वाडीच्या मानाप्रमाणे 5 व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामध्ये तंबोरेधारक 1 व्यक्ती, 3 भजनकर्ते, 1 मृदूंगवादकाचा समावेश असेल. पालखी मिरवणुकीची प्रथा फक्त 5 व्यक्तींमध्ये पार पडेल. नामसप्ताहात भाविकांना मंदिरामध्ये दर्शनासाठी उपस्थित राहता येणार नाही. नारळ, हार, पेढे असे कोणत्याही देवाला अर्पणासाठी आणू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत.

भाविकांना आवाहन
जिल्ह्याबाहेरील भाविकांना नामसप्ताहात सहभागी व्हायचे असल्यास 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागेल. गावाबाहेरील कोणचेही भजन होणार नाही. मंदिराच्या परिसरात दुकाने, खाद्यपदार्थ, स्टॉल स्थापन करण्यास मनाई आहे. मास्क बांधणे, सुरक्षित अंतर ठेवणे अनिवार्य आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT