kokan dumping case Fishing is a must kokan fisher news 
कोकण

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती : मासेमारी करणे बेतले असते जीवावर 

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा अनुभव कराड येथून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या तरुणांना आला. शहराजवळील भगवती बंदर येथे पर्यटनासाठी आलेले तरुण मासेमारीसाठी समुद्रातील खडकावर गेले. भरतीचे पाणी वाढल्यामुळे किनाऱ्यावर परतताना त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांच्या मदतीने अखेर तो तरुण किनाऱ्यावर परतण्यात यशस्वी झाला. 

रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास एक तरुण कराडहून रत्नागिरीत फिरण्यासाठी आला होता. त्याच्या रत्नागिरीतील मित्रासोबत तो भगवती बंदर येथे मासेमारीसाठी गेला. सकाळी ओहोटी असल्यामुळे पाणी कमी होते. त्यामुळे त्यांना समुद्रकिनाऱ्यावरुन थोडं पाण्यातील भागात खडकांचा आधार घेत जाता आले. पौर्णिमा असल्यामुळे तासाभरातच पाणी भरायला लागले. पाणी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो किनाऱ्याकडे येऊ लागला. परत येण्याच्या मार्गावरच पाणी आल्यामुळे तो तरुण खडकावरच अडकून पडला. त्यातील एकाला पोहता येत असल्यामुळे तो पाण्याबाहेर आला. पण कराडमधील तो युवक पोहता येत नसल्यामुळे तिथेच अडकून पडला. 

भगवतीजवळील प्रकार; पोलिसांमुळे तरुण वाचला 

चोहोबाजूला पाणी पाहिल्यानंतर तो घाबरला होता. दगडाचा आधार घेऊन तो आतमध्येच अडकून पडला. किनाऱ्यावर आलेल्या त्या मित्राने इतर मित्रांना दूरध्वनीवरुन ही माहिती कळवली. त्या मित्रांनी पोलिसांना कळवल्यावर अडकून पडलेल्या मित्राला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अखेर त्या युवकाला पाण्याबाहेर काढून त्याची सुटकाही करण्यात आली. पाण्याबाहेर येताच ते दोन्ही युवक तेथून तत्काळ निघून गेले.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT