konkan people enjoying crab special food
konkan people enjoying crab special food 
कोकण

चावा घेतला, की बोबडी वळलीच समजा

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : कोकणात दमदार पाऊस सुरू आहे. नदी, ओढ्यांना प्रचंड पाणी असून, त्यांचा प्रवाह गतिमान झाला आहे. या पाण्यातून मिळणारे खेकडे पकडण्यासाठी ग्रामीण भागातील हौशी, खवय्ये गरली घेऊन हा मजेशीर अनुभव लुटत आहेत. 

मंडणगड तालुक्‍यातील पाले, तुळशी, पाचरळ, बोरघर, माहू, नारगोली, कोंजर, अडखळ परिसरांतील गावांतून अशी परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे, तर खाडी पट्ट्यातील खाजणात भरती-ओहोटीचे अंदाज बांधून चिखलात बिळातून थिरले काढताना लागणारे कसब पाहून थक्क व्हायला होते. 

पहिल्या पावसात खेकडा मादी आपली पिल्ले पाण्यात सोडते. एक खेकडा कमीत कमी शंभर ते दीडशे पिल्लांना सोडून देत असतो. यावेळी ते एका जागेवर स्थिर असतात. गावागावांतून अनेकजण चार चारच्या टोळीने रात्रीच्या वेळेस विजेऱ्यांच्या प्रकाशात हे खेकडे पकडण्यासाठी जातात. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातून रवाना होऊन तीन-चार तासांत पुन्हा घरी परतत असून त्यांना मोठ्या प्रमाणावर छोटी, मोठी खेकडे सापडत आहेत. एका खेपेस ते ६० ते ७० खेकडे पकडून आणत असून चवीने खाणारी संख्याही जास्त आहे. 

चावा घेतला, की बोबडी वळलीच समजा... 

एका काठीला टाकाऊ मांसल भाग बांधून गरली तयार केली जाते. त्याला खाण्यासाठी खेकडे येत असून, पाण्यात टाकलेली काठी फिरली जाते. त्यानंतर ती अलगद उचलून त्याला आलेला खेकडा पकडण्याचे कसब आजमावणे एक वेगळा अनुभव असतो. पकडलेल्या खेकड्याला पिशवीत टाकताना त्यांना कसरत करावी लागते. मात्र, खेकडा पकडताना अंदाज चुकला आणि खेकड्याने हाताला चावा घेतला, की बोबडी वळलीच समजा.

संपादन - स्नेहल कदम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT