कोकण

कोकणातील गोठवेवाडीचे ‘माळीण’ बनू देऊ नका

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - खचलेल्या जमिनीचे गंभीर स्वरूप लक्षात घेता येथे माळीण होण्याची वाट बघण्यापेक्षा आमचे तत्काळ पुनर्वसन करा, अशी आर्त मागणी गोठवेवाडीवासीयांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. पुनर्वसनासाठी सुरक्षित जागा निश्‍चित करा, आवश्‍यक ते पैसे देऊ, असे आश्‍वासन श्री. केसरकर यांनी यावेळी दिले.

सावंतवाडी तालुक्‍यातील नैसर्गिक आपत्तीचे केसरकर यांनी आज सकाळी पाहणी केली. शिरशिंगे गोठवेवाडी येथे काल (ता.८) डोंगर व रस्ता खचल्याने २० कुटुंबातील ८६ जणांना प्रशासनाने स्थलांतरीत केले होते. या घटनेची सकाळी पालकमंत्री केसरकर यांनी प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.

यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, बांधकाम अभियंता युवराज देसाई, उपअभियंता ए. के. निकम, आदी उपस्थित होते. यावेळी केसरकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. गोठवेवाडी वस्ती उंचवठ्यावर वसली आहे. याठिकाणी वस्तीमधून जाणारा रस्ता तसेच डोंगराला भेगा गेल्याने गोठवेवाडीला धोका निर्माण झाल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

केसरकर म्हणाले, खचलेल्या ठिकाणी तत्काळ संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे. तर पुनर्वसनासाठी लागेल तो निधी उपलब्ध करुन देतो, तसा प्रस्ताव द्या; मात्र पुनर्वसन कोठे करायचे ते तुम्ही ठरवा, असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले; मात्र माळीण होण्याआधी याबाबत उपाय करा, असे ग्रामस्थ म्हणाले.
यावेळी माजी सरपंच सुरेश शिर्के यांनी लक्ष वेधताना रस्त्याला गेलेल्या भेगामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्यामुळे सुरक्षित असलेल्या पन्नास घरापर्यंत जाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी प्रस्तावित असलेल्या रिंग रोडचे काम मार्गी लावून ग्रामस्थांची गैरसोय दूर करा, अशी मागणी केली.

याबाबत केसरकर यांनी या रिंग रोडच्या खडीकरण्याचे काम तत्काळ हाती घेण्याची सूचना बांधकाम अभियंता युवराज देसाई यांना केली. डांबरीकरणासाठी निधी लवकरच निधी देतो, असे आश्‍वासन दिले. गुरुवारी रात्र भीतीच्या छायेखाली घालवूनही याठिकाणी एकही पोलिस कर्मचारी उपलब्ध नव्हता, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. येथील कुटुंबीयांचे स्थलांतर झाले असताना त्याच्या घरातील दागिन्यांच्या सुरक्षिततेचे काय असा सवाल उपस्थित केला असता आजपासून याठिकाणी पोलिस तैनात ठेवण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

तालुक्‍यातील सह्याद्री पट्ट्यात भूस्खलनाचे प्रमाण हे मोठे आहे. याबाबत भूगर्भतज्ज्ञांकडून याचा तपास करण्यात येणार असून नेमके कारण शोधले जाणार आहे. स्ट्रक्‍चरल ऑडिट करून धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. शिवाय ज्यांचे यात नुकसान झाले आहे त्यांना भरपाई देण्याची सूचना प्रशासनाला दिली आहे, असे केसरकर यांनी सांगितले. यावेळी सरपंच रेखा घावरे, पंढरीनाथ राऊळ, सुरेश शिर्के, पोलिस पाटील गजानन राऊळ, ग्रामस्थ पांडुरंग राऊळ, सहदेव शिर्के, जीवन लाड, वसंत घावरे, अनिल कदम, वसंत शिर्के, लाडू शिर्के, सुभाष सुर्वे आदी उपस्थित होते.

भेगा अधिक रुंदावल्या
शिरशिंगे गोठवेवाडी येथे बुधवारी रस्त्याला पडलेल्या भेगा तिसऱ्या दिवशी अधिक रुंदावल्या होत्या. आजची परिस्थिती पाहता पाऊस पुन्हा वाढल्यास हा भाग कोसळण्याची संभावना आहे. तेथील २० कुटुंबीयांना स्थलांतरीत केले तरी घरांना धोका कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT