कोकण

कोयना धरणातून वीजनिर्मितीवर मर्यादा

सकाळवृत्तसेवा

चिपळूण - कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा आली आहे. राज्यात जास्त मागणी असलेल्या कालावधीत आवश्‍यकतेनुसार प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जात आहे. कोयना धरणातील १०० टीएमसी पाण्याचा प्रथमच वीजनिर्मिती व सिंचनासाठी वापर करण्यात आला. त्यामुळे धरणात खडखडाट झाला आहे. सद्यःस्थितीत केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबल्यास त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर होण्याची शक्‍यता आहे. सिंचन व वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येणारे पाणी कपात करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. त्याबाबतचे पत्र महानिर्मिती कंपनीला देण्यात आले आहे. 

१०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणातील पाण्याचे वाटप कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्देशानुसार केले जाते. ६७.५० टीएमसी पाणीसाठा पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी, तर ४० टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचनासाठी देण्यात येतो. धरणातून आतापर्यंत ३७.५ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.

धरणाच्या पायथा वीजगृहातून २१००, धरणाच्या आपत्कालीन विमोचक्र दरवाजातून १,००० असे एकूण ३,१०० क्‍यूसेक पाणी दररोज देण्यात येते. पायथा वीजगृहातून आतापर्यंत ३३.३९ टीएमसी, तर आपत्कालीन विमोचक्र दरवाजातून ४.११ असा ३७.५ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.

पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी कोयना प्रकल्पाने तयार केलेल्या पाणीवाटप आराखड्यानुसार ६६.२ टीएमसी पाणी प्रस्तावित केले आहे. महानिर्मिती कंपनीने ६१.९४ टीएमसी पाण्याचा वापर करून ४.०८ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर शिल्लक ठेवला आहे. पूर्वेकडे व पश्‍चिमेकडे धरणातून पूर्णक्षमतेने पाणी वापर होत असल्याने धरणाची पाणी पातळी खालावली आहे. धरणात १९.५१ टक्के पाणीसाठा असून त्यातील १४.३९ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. ३१ मेपर्यंत धरणातील पाणी सोडण्यात यावे,अशी सूचना सांगली पाटबंधारे विभागाने केली आहे. 

कोयना धरणात पाण्याची कमतरता आहे.त्यामुळे वीजनिर्मितीसाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडता येणार नाही. पाण्याचे नियोजन न झाल्यास वीजनिर्मिती बंद करण्याचा धोका आहे. याबाबतची सूचना महानिर्मिती कंपनीला पत्राद्वारे देण्यात आली आहे.
- वैशाली नारकर,
अधीक्षक अभियंता, कोयना सिंचन मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६ हजार ८५० मते वाढली- राहुल गांधी

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT