lockdown impact in mandangad ratnagiri 
कोकण

प्रशासनाने टेकले हात ; कोरोनाची लढाई आता ग्रामस्थांच्या हाती

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोनाच्या लढाईत उपाययोजना करताना प्रशासन हतबल झाले आहे. एक महिन्याच्या कालावधीतच प्रशासकीय यंत्रणेने हात टेकले असून आता या पुढील लढाई ग्रामस्थांनीच करावी लागणार आहे. मंडणगड तालुक्यात मुंबई, पुणे व अन्य ठिकाणांवरून येणाऱ्या नागरीकांची प्राथमिक तपासणी करून त्यांना हातावर शिक्का मारून स्वग्रुही होम क्कारंन्टाईन करून ठेणार असल्याची माहिती तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.

तसेच 14 दिवसांच्या कालावधीत क्कारंन्टाईन केलेल्या नागरीकांची आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत घरी जावून तपासणी करण्यात येणार आहे. सर्दी, ताप, खोकला यांची लक्षणे आढळल्यास आरोग्य अधिकारी यांच्या शिफारशीनेच स्वॅब तपासणी केली जाईल. तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे इंसीडंन्ट कंमांडर नारायण वेंगुर्लेकर यांनी याबाबत नगरपंचायत प्रशासन, गटविकास अधिकारी यांना लेखी पत्र पाठवून आपापल्या स्तरावर उपाययोजना करण्याचे सुचविले आहे.

वाडीनिहाय कृतीदल तयार करून सदर क्कारंन्टाईन केलेली व्यक्ती स्वगृही विलगीकरणात रहात असलेबाबत खात्री करावी. सदरची व्यक्ती उल्लंघन करत असल्यास ही बाब आरोग्य विभागाच्या निदर्षनास आणून द्यावी. होम क्कारंन्टाईन केलेल्या व्यक्तीने पुढील 14 दिवस कोणत्याही अन्य व्यक्तीच्या संपर्कात येवू नये, कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये.

क्कारंन्टाईन  कालावधीमध्ये घेण्यात येणाऱ्या दक्षतेबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत सुचना पत्रक तयार करून प्रत्येक ग्राम कृतीदलास द्यायचे आहे. त्याचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी ग्रामकृतीदलाकडे राहणार आहे. स्वगृही अलगीकरण ठेवलेल्या माहितीचे भित्तीपत्रक सदरच्या घराबाहेर लावण्यात यावे, यावर गटविकास अधिकारी यांनी पूर्ण लक्ष दयायचे असून स्वगृही अलगिकरण अथवा संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीची नोंद नोंदवहित ठेवायची आहे. त्यामुळे यापूढील कोरोना विरुद्ध लढा देण्याची सर्वस्वी जबाबदारी गावातील ग्रामस्थांवर प्रशासनाने सोपवल्याचे दिसून येत आहे.


जर काही गावातील लोकांनी मुंबई पूणे येथून येणाऱ्या व्यक्तींना घरात येण्यास मज्जाव केल्यास त्यांना ग्रामकृतीदल यांनी जवळच्या संबंधीत शाळेत किंवा उपलब्ध असलेल्या ठिकाणी ठेवायचे आहे. त्यांची व्यवस्था त्यांच्या घरातील लोकांमार्फत व कृतीदलामार्फत करावयाची आहे. त्यावर गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण राहणार आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT