कोकण

काजू उत्पादनात मोठी घट

सकाळवृत्तसेवा

कडावल - ढगाळ वातावरणाचा परिसरातील काजू उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला असून उत्पादनात कमालीची घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत काजूला बाजारभावही अतिशय कमी मिळत आहे. अल्प  उत्पादन व दरामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

काजू कोकणातील महत्त्वाच्या बागायती पिकांपैकी एक मानले जाते. येथील अनेक शेतकऱ्यांनी काजूच्या कलमांची आधुनिक पद्धतीने लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांकडे पारंपरिक लागवडीखालील काजूची जुनी झाडेही आहेत. या वृक्षांपासून शेतकऱ्यांना दरवर्षी काही प्रमाणात उत्पन्न मिळते. काजू पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याने त्याच्या लागवडीखालील  क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

यंदा मात्र काजूनेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे. ढगाळ वातावरणामुळे काजू उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे. गतसालच्या तुलनेत यंदा काजूला दरही कमी मिळत आहे. गेल्या वर्षी काजूचा दर प्रतिकिलो १९० रुपयांपर्यंत पोहोचला होता. तर यंदा तो प्रतीकिलो १२० रुपयांवर रेंगाळत आहे. काजू उत्पादन कमी व बाजारभावही अत्यल्प, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.

गेला खरीप भात शेती हंगाम नुकसानीत गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा काजूवर अवलंबून होत्या. आता काजूनेही दगा दिल्यामुळे  शेतकरी अडचणीत सापडले असून संसाराचा गाडा कसा हाकावा, हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवणार…?' दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर नेटकऱ्यांनी घेतली मजा

The Patna-Kota Express Train: स्टेशन मास्तरला झोप लागली अन्.. अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला ट्रेनचालक

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Kangana Ranaut : ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

SCROLL FOR NEXT