श्रावणबाळाचे तळे
श्रावणबाळाचे तळे sakal
कोकण

मालवण : श्रावणमधील प्रथा पिढ्यान्‌पिढ्या पाळला जातोय नियम

- प्रशांत हिंदळेकर

मालवण: सिंधुदुर्गात अनेक प्रथा परंपरा धार्मिकतेशी जोडल्या आहेत. यातून अनेक गावे वैशिष्ट्ये पिढ्यान्‌पिढ्या जपत आहेत. श्रावण-तळीवाडी हे असेच एक गाव. तिन्हीसांजेनंतर तिथे रडायला मनाई आहे. हे गाव अनेक पिढ्या पूर्ण शाकाहारी, दारुपासून पूर्ण दूर आहे.श्रद्धा, अंधश्रद्धा या द्वंदात हार जीत नसते; असते ती फक्त भावभावनाबरोबरच वैचारिक बैठक आणि या बैठकीतून पुन्हा एकदा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होतो.

सर्व कच्च्या प्रश्‍नांची उत्तरे तपासली जातात. त्यातच तो गुरफुटून जातो. दिवसामागून दिवस सरले. वर्षामागून वर्षे उलटली मात्र आजही श्रावण-तळीवाडी गावात कितीही करुण प्रसंग आला तरी कुणी रडत नाही. कुणीही आरडाओरड करत नाही आणि केलाच तर त्याला श्री देव क्षेत्रपालच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशी येथे श्रद्धा आहे. पिढ्यान्‌पिढ्या असेच घडत आहे. मालवणपासून २२ किलोमीटर अंतरावर असणारे श्रावण-तळीवाडी हे गाव. यात सत्ता आणि हुकुमत चालते ती फक्त आणि फक्त गावचे प्रमुख दैवत श्री देव क्षेत्रपालाची. त्याच्या मर्जीविना या गावात साधं पानही हलत नाही, अशी श्रध्दा येथे गावकरी पिढ्यान्‌पिढ्या मानत आले आहेत. खरं तर सूर्य मावळतीकडे झुकला की या श्रावण-तळीवाडीमध्ये कुणी रडत नाही. गाव विविध वैशिष्ट्यांनी भरलेले आहे. येथे पुरातन असे पांडवकालीन गणेश मंदिर असून बाजूलाच एक गुहा आहे.

या गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपाल आहे. या गावाचा अधिकारी म्हणून श्री देव क्षेत्रपालाकडे पाहिले जाते. चारही बाजूंना डोंगर आणि डोंगराच्या कुशीत असलेले क्षेत्रपालाचे मंदिर मोहित करते. क्षेत्रपाल मंदिराच्या आजूबाजूला शेतजमीनीतून वाट काढत आणि अलीकडच्या काळात बांधलेल्या दगडी पाखाडीने या मंदिरात जावे लागते. मंदिरात शिवपिंडीच्या रूपाने क्षेत्रपालाचे अस्तित्त्व असून मंदिरात काही विरगळ आणि बारापाचाची पाषाणे आहेत.

श्रावणबाळाचे तळे

श्रावण तळीवाडी भागातील या मंदिराच्या बाजूलाच पाण्याचे एक तळे आहे. हे तळे पुराण कथेतील श्रावण बाळाचे तळे म्हणून ओळखले जाते. पुराणकाळातील श्रावण बाळाची गोष्ट याचठिकाणी घडली अशी आख्यायिकाही असल्याचे या भागातील स्थानिक जाणकार सांगतात. या तळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मुसळधार पाऊस पडला किंवा महापूर आला तरी हे तळे दुथडी भरून वाहत नाही; मात्र उन्हाळ्यात, पावसाळा संपला की जसजसा उन्हाळा सुरू होतो तसतसा या तळ्याचे पाणी दुथडी भरून वाहू लागते. या तळ्याच्या पाण्याची चवही या भागातील विहिरींच्या पाण्यापेक्षा वेगळीच आहे. या तळ्याच्या पाण्यात जर एखाद्याने भात शिजविला तर त्या भाताचा रंग रक्तासारखा लालेलाल होतो, असे स्थानिक सांगतात. त्यामुळे या तळ्याच्या पाण्याचा उपयोग जेवणासाठी होत नाही; मात्र या तळ्याचे पाणी पिण्यास वापरतात. या तळ्याच्या पाण्यावरच तेथील शेती व भाजीपाला पिकतो.

श्रावण गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इतिहासात याबाबतच्या ठळक नोंदीही आहेत. तळीवाडी भागात तिन्हीसांजेच्या वेळी कोणीही रडत नाही. हे या वाडीचे वेगळे वैशिष्ट्य आहे. पिढ्यान्‌पिढ्या ही प्रथा स्थानिकांनी जोपासली आहे आणि यापुढेही ती अविरतपणे जोपासणार आहोत.

- कमलाकांत कुबल, स्थानिक रहिवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT