mango from konkan exports to ahmedabad from pawas in ratnagiri 
कोकण

आंबाप्रेमींचा हापूस अहमदाबादला रवाना

सकाळ वृत्तसेवा

पावस (रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्‍यातील गणेशगुळे येथील प्रगत आंबा बागायतदार शशिकांत बाबू शिंदे यांनी या मोसमातील हापूस आंब्याच्या पाच पेट्या अहमदाबाद मार्केटला पाठवून पहिला आंबा पेट्या पाठवण्याचा मान मिळवला. पेटी प्रथम पाठवण्याचा मान सलग सहाव्या वर्षी मिळवला. पावस परिसरात हापूस आंबा कलम लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.

दरवर्षी हवामानाचा विपरित परिणाम होत असल्यामुळे अनेकांचा आंबा मोसम कमी जास्त प्रमाणात असतो. अनेक फवारण्या करून आंबा पीक वाचवण्याचे काम प्रत्येक आंबा बागायतदार करत असतो. तालुक्‍यातील गणेश गुळे येथील शशिकांत बाबू शिंदे हे वयोवृद्ध आंबा बागायतदार गेले अनेक वर्ष आपला व्यवसाय करताना आंबा बागेची योग्य जोपासना, फवारणी व बागेत साफसफाई करणे याकडे प्रामुख्याने लक्ष देतात. त्याच बरोबर समुद्रकिनाऱ्यावर असलेली बाग तिला मिळालेले पोषक वातावरण यामुळे गेली पाच वर्ष डिसेंबर-जानेवारी यादरम्यान पहिली पेटी पाठवण्याची परंपरा चालू ठेवली आहे.

याबाबत शिंदे म्हणाले, आंबा बाग तयार करताना त्याची योग्य निगा फळधारणेच्या वेळी योग्य ती काळजी घेऊन मुलाप्रमाणे त्याचे संगोपन करण्याचे काम गेली अनेक वर्ष करत आहे.
आंबा काढणी तंत्रज्ञान विकसित करणार १८ जानेवारी २०२१ रोजी ४ डझन, पाच डझन आणि सहा डझन अशा पाच पेट्या अहमदाबाद मार्केटला रवाना करण्यात आल्या. त्यामुळे यापुढील पेट्या येत्या काही दिवसांत पाठवल्या जातील, त्यादृष्टीने आंबा काढणी तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री घायवळ गँगचा धुमाकूळ; गोळीबारात एक जण गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

माेठी बातमी! 'शिरवळमध्ये भरदिवसा गाेळीबार'; घटना सीसीटीव्‍हीत कैद, तिघांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ, नेमकं काय घडलं..

Chh. Sambhajinagar Accident : माळीवाडा पुलावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरखाली दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य

सरकारचा मोठा निर्णय! आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ‘या’ लाखो लोकांचे जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार आणि पोलिसांकडून दाखले जप्त होणार, नेमका आदेश काय?, वाचा...

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

SCROLL FOR NEXT