nagpanchmi festiveal positive story in rajapur ratnagiri distric 
कोकण

लॉकडाऊनचा सदुपयोग - ‘मूकबधिर’चे माजी विद्यार्थी आत्मनिर्भर

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : येथील (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचे माजी विद्यार्थी आत्मनिर्भर होत आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात शाळेचे माजी विद्यार्थी अलीकडेच यश देसाई व रुपेश झोरे यांनी नागपंचमीसाठी शाडूच्या मातीपासून आकर्षक नागमूर्ती साकारल्या असून त्याची विक्रीसुद्धा आजपासून सुरू केली.


 सुमारे महिनाभर हे विद्यार्थी घरच्या घरी नागमूर्ती साकारत होते. रंगकामही सुरेख केले आहे. या मूर्तींच्या विक्रीतून या दोघांनाही व्यवहारज्ञान कळणार आहे. श्रावण महिना सुरू होत असून 25 जुलैला नागपंचमी असल्याने आजपासून त्यांनी विक्री चालू केली आहे.दरवर्षी नागपंचमीला शाळेतच नागमूर्ती, हरितालिकेच्या मूर्ती बनवल्या जातात. यंदा कोरोनामुळे शाळा बंद असल्याने माजी विद्यार्थ्यांनी नागमूर्ती साकारल्या. त्याकरिता त्यांना मुख्याध्यापक गजानन रजपूत, शिक्षक रमेश घवाळी यांनी मार्गदर्शन केले. लॉकडाऊनच्या काळात आत्मनिर्भर होण्याचा मंत्र या विद्यार्थ्यांना मिळाला. त्यातून रोजगारनिर्मिती झाली आहे.

दि न्यू एज्युकेशन सोसायटीने 2 जुलै 1982 रोजी मूकबधीर विद्यालयाची स्थापना केली. त्या वेळी खेडोपाडी जाऊन विद्यार्थी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. या शाळेतील मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच भाषा, गणित आणि व्यवहारज्ञान शिकविले जाते. आत्मनिर्भर होण्यासाठी या मुलांना शाळेतच मूर्तिकाम, हस्तकला, सुतारकाम, शिवणकला या कला शिकवल्या जातात. या मुलांकडे हस्तकला खूपच सुरेख असल्याचे हस्तकला प्रदर्शनातून दरवर्षी पाहायला मिळते. विद्यार्थी आत्मनिर्भर व्हावेत याकरिता संस्था व शाळा प्रयत्नशील आहे, असे मुख्याध्यापक गजानन रजपूत यांनी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT