narayan rane, sanjay raut sakal
कोकण

मवाळपणा माझ्या रक्तातच नाही, नारायण राणेंचा प्रहार

कुंडली काढण्याचा मुहूर्त ठरला : ठाकरे खासगीत बोलले तरी राणेंना कळतं.

अर्चना बनगे

सिंधुदुर्ग: सामनामधून होणारी टीका थांबवली नाही तर प्रहार मधून उत्तर देणार. नितेश, निलेश राणेंवर हल्लाबोल करणाऱ्या संजय राऊत यांना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी इशारा दिला आहे. संजय राऊत शिवसेना संपवण्याचे काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून कारभार सुलभ व्हावा यासाठी काही मदत करत नाहीत. अग्रलेख लिहिताना विधायक,सामाजिक, विकासावर ते अग्रलेख लिहू शकत नाहीत. असा प्रतिहल्ला ही राणेंनी केला आहे. एबीपी या वृत्तवाहिनीवर मुलाखतीत नारायण राणेंनी एकूणच आपल्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला. काय म्हणाले मुलाखतीत नारायण राणे सविस्तर जाणून घेऊया.

माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले. शिवसेनेत असतानाही असे अनेक प्रसंग विरोधकांकडून आले. आणि आता शिवसेनेकडून असे अनेक प्रकार घडत आहेत. मी खचून जाणारा नाही. माझं खच्चीकरण मी होऊ देत नाही. माझे काही मित्र म्हणतात. कोर्टाची ॲक्शन घेतल्यानंतर राणे मवाळ झाले आहेत. मवाळपणा हा माझ्या रक्तात नाही. अनेक लोकांशी लढतोय. शिवसेनेत असताना शिवसेनेच्या विरोधकांशी लढलोय. 91 पासून मला संरक्षण आहे. कोकणात आल्यानंतर जनसमुदाच्या उपस्थितीवरून स्पष्ट होते की, जनतेचे माझ्यावर किती प्रेम आहे.

माझ्यात जो आवेश आहे, जिद्द आहे हे माझ्या रक्तातच आहे. उगाच उतावळेपणाचा आव मी आणत नाही. काही जणांना आपण काय बोलतो हे समजत नाही.

ते पुढे म्हणाले, माझ्यात जो आवेश आहे, जिद्द आहे हे माझ्या रक्तातच आहे. उगाच उतावळेपणाचा आव मी आणत नाही. काही जणांना आपण काय बोलतो हे समजत नाही. बोलतात एकीकडे हातवारे, एकीकडे चेहरे करतात. बाळासाहेब गेले तेव्हाच ठाकरे भाषा तिथेच संपली. ती शैली, तो आवेश आता पाहायला मिळणार नाही. कोणीही आव आणू नका.अनेक प्रसंग मी जवळून पाहिले आहेत .नुसते आडनाव लावले म्हणजे ठाकरे भाषा होत नाही. यासाठी गुणात्मक कृती दिसायला हवी. असा हल्लाबोल ही उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणेंनी केला.

उद्धव ठाकरे खासगी मध्ये बोललं तरी मला कळतं. सूडबुद्धीने जर कारवाईच करत राहिले तर जशास तसं उत्तर देण हे आमचं काम आहे. मी भाजपात आहे याची मला जाणीव आहे. मी जाणीवपूर्वक कोणाची कळ काढत नाही.आणि मला विनाकारण डिवचण्याचे काम करू नये असा सूचक इशाराही राणेंनी दिला.संजय राऊत शिवसेना संपवण्याचा काम करत आहे.उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून कारभार सुलभ व्हावा यासाठी काही मदत नाहीत. अग्रलेख लिहिताना विधायक ,सामाजिक विकासावर अग्रलेख लिहू शकत नाहीत.

माझ्यापासून ठाकरे कुटुंबाला कोणताही त्रास होणार नाही. याचीही खबरदारी मी घेईन. कारण मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं. उद्धव ठाकरे यांच्याशी माझं वैयक्तिक वैर नाही. संजय राऊत यांच्या पासून माझ्यावर टीका करायला सुरुवात झाली. आणि याच उत्तर मला द्यावेच लागेल. मी गप्प बसणार नाही. त्यांना आता गप्प बसावं. नाहीतर गौप्यस्फोट होईल. असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

प्रभुकुंज ते दुबईचे रेस्टॉरंट! आशा ताईंच्या निधनानंतर त्यांच्या अफाट मालमत्तेचा मालक कोण? त्यांच्या मृत्युपत्रानुसार...

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला 'या' शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करा; आयुष्यात येईल अखंड समृद्धी

हा मुलगा खरंच १४ वर्षांचा आहे? ललित मोदीचं Vaibhav Sooryavanshi बाबत खळबळजनक विधान; म्हणाले, माझा मुलगा या वयाचा आहे...

SCROLL FOR NEXT