nature hurricane impact in ratnagir 
कोकण

चक्रीवादळाचा परिणाम : 'उद्योग व्यवसाय, उत्पन्नाच्या साधनांची नव्याने निर्मिती अन् शेतकऱ्यांसाठी उपक्रम तयार करावा'

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळातून जनजीवन, उद्योग व्यवसाय पूर्वपदावर येण्याकरिता बराच कालावधी लागेल. अन्न, वस्त्र, निवारा, वीज, पाणी या गरजा भागवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत; परंतु उद्योग व्यवसाय, उत्पन्नाची साधने नव्याने निर्माण करावी लागणार आहेत. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, तंत्रज्ञ, कृषी विद्यापीठ यांची यंत्रणा उभी करावी लागेल. सहा महिने, वर्ष नव्हे, तर किमान १० वर्षे कायमस्वरूपी काम करावे लागेल, असे प्रतिपादन केळशीतील महेश परांजपे यांनी केले.


ते म्हणाले, आंबा, काजू, नारळ, पोफळी अशा पीकांसाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. जागा रिकामी केल्यास तिथे कमी खर्चात आंतरपिक घेता येईल. केळशी गावाचा विचार करता, येथील आंबा उत्पादक सहकारी संस्था जिल्ह्यात अग्रगण्य आहे. आंबा उत्पादक सभासद व बिगर सभासदांना मदत करणे शक्‍य आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही मदत करता येईल. हापूसच्या जीआय मानांकनासाठी एजन्सी म्हणूनही ही संस्था काम करते. संस्थेने शेतकऱ्यांसाठी उपक्रम तयार करावा.

गरजेनुसार पाच-दहा टीम तयार कराव्यात. या टीम सदस्यांना झाडे तोडणी व अन्य सुरक्षिततेचे प्रशिक्षण देऊन दररोज झाडे तोडणी व पाठपुरावा करता येईल. बागा उद्‌ध्वस्त झाल्याने पडलेली झाडे बाजूला करून ती लाकूडफाटा बागेपासून थोडी लांब न्यावीत. कारण अस्तित्वात असणाऱ्या झाडांना खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. माती सैल झाल्याने हललेल्या झाडांच्या मुळाशी टाळमाती घातली पाहिजे. कारण पाणी लागून मुळे कुजण्याची भीती परांजपे यांनी व्यक्त केली आहे.


नियम शिथिल करावेत. पावसात रान वाढले की पडलेली झाडेसुद्धा दिसणार नाहीत. त्यामुळे ती वेळीच तोडावीत व लाकडे विकता येतील किंवा इंधनासाठी वापरता येतील. यासाठी शासनाने वाहतूक व तोडकामाचे नियम शिथिल करावेत, असे मत श्री. परांजपे यांनी मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT