कोकण

'OBC आरक्षण न मिळाल्यास केंद्रसरकारच जबाबदार'

सकाळ वृत्तसेवा

ओबीसींना जर आरक्षण मिळालं नाही तर केंद्रसरकार जबाबदार राहील..

कुडाळ : ओबीसी समाजातील जनतेवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे. हा अन्याय दूर झाला नाही तर केंद्र सरकारच्या विरोधात जनआंदोलन उभारावं लागेल. ओबीसींना जर आरक्षण मिळालं नाही तर केंद्रसरकार जबाबदार राहील, असा इशारा शिवसेना ओबीसी सेल सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी दिला आहे.

याबाबत येथील तहसीलदार अमोल पाठक यांना यावेळी निवेदन देण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, गेले अनेक महिन्यांपासून ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने, 'राज्य सरकारने मागास आयोग तयार करून त्या माध्यमातून डाटा तयार करावा आणि पुन्हा कोर्टात द्यावा' असा आदेश दिला आहे. त्यामुळे, केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा राज्यसरकारला द्यावा असे अपेक्षित आहे. तरच आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. असे जर झालं नाही तर केंद्र सरकार वेळकाढू धोरण अवलंबत आहे, असे गृहीत धरून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.

ओबीसी समाजातील जनतेवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे. हा अन्याय दूर झाला नाही तर केंद्रसरकारच्या विरोधात जनआंदोलन उभारावं लागेल. ओबीसी ना जर आरक्षण मिळालं नाही तर केंद्रसरकार जबाबदार राहील, असे श्री पावसकर यांनी म्हटले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, राजन नाईक, युवा समनव्यक सुशील चिंदरकर, राजू गवंडे, नितीन सावंत, बाळा वेंगुर्लेकर, विजय पावसकर, रुपेश कांबळी, प्रवीण नेरुरकर, आबा पावसकर, जयगणेश पावसकर, मिलिंद खोत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT