कोकण

1947 चा अमृतमहोत्सवी कल्पवृक्ष आजही डौलाने उभा!

हातीसमध्ये पूर्वजांचा वारसा ग्रामस्थ जपणार; नारळाच्या ७५ रोपांची होणार रुजवात

- मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : पहिल्या स्वातंत्र्यदिनी जे कल्पवृक्षाचे झाड हातीस ग्रामस्थांनी लावले, ते आजही डौलाने उभे आहे. हे झाड लावण्यासाठी पुढाकार घेणारे आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पाहायला हयात नाहीत. परंतु, त्यांची स्मृती जपण्यासाठी अमृतमहोत्सवानिमित्त गावात नारळाची ७५ रोपे लावण्याचा उपक्रम ग्रामस्थांनी हाती घेतला. यासाठी आज रोपांचे वितरण करण्यात आले आणि पूर्वजांचा हा वारसा ग्रामस्थ पुढे नेत आहेत. अमृतमहोत्सवानिमित्त आज गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

स्वातंत्र्यदिनी ७५ वर्षांपूर्वी हातीसच्या भैरी-जुगाई मंदिराच्या आवारात नारळाचे रोप लावण्यात आले. त्या वेळी स्वातंत्र्य मिळाल्याने आनंदाचे वातावरण होते आणि रोपाची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली होती. स्वातंत्र्यदिनाचे हे प्रतीक आजही हातीसमध्ये डौलाने डोलत आहे. २००६ पासून दरवर्षी हातीस ग्रामस्थ आणि शाळेतील मुले स्वातंत्र्यदिनी त्या कल्पवृक्षाचा वाढदिवस पारंपरिक आरती ओवाळून आणि आधुनिक पद्धतीने केक कापून साजरा करतात.

अनेक वेळा हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला आहे. परंतु, कोरोनामुळे यंदा वाढदिवस मोठ्या स्वरूपात साजरा न करता ग्रामस्थांना नारळाच्या ७५ रोपांचे वितरण केले आहे. ही रोपे जगविण्याची ग्वाही ग्रामस्थांनी मान्यवर पाहुण्यांना दिली. नारळाची टी-डी, डी-टी, कोकण भाट्ये १, प्रताप, लक्षद्वीप, फिलिपीन्स, ऑरेंज डॉर्फ आणि केराबस्तर या प्रकारची रोपे वितरित केली आहेत. ही रोपे आपल्या आवारात किंवा बागेत लावून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी ग्रामस्थ सज्ज आहेत. त्या वेळी अगदी लहान असणारे आज वयोवृद्ध आहेत. त्यातीलच एक विजय नागवेकर यांनी सांगितले, की आमच्या आधीच्या पिढीने स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवशीच बांबू उभा करून ध्वज फडकावला. त्यानंतर आनंदोत्सव साजरा झाला आणि नारळाचे झाड लावण्यात आले. त्याचा वाढदिवस गेली १५ वर्षे आम्ही साजरा करीत आहोत. यंदा अमृतमहोत्सवानिमित्त ७५ रोपे लावणार आहोत.

या आगळ्या उपक्रमात कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, नारळ बोर्डाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, कुमार शेट्ये, कृषीविद्यावेत्ता भाट्ये (ता. रत्नागिरी) येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे माजी कृषी विद्यावेत्ता व ग्रामस्थ डॉ. दिलीप नागवेकर, कॅप्टन दिलीप भाटकर, सरपंच कांचन नागवेकर सहभागी झाले. तसेच, हातीस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अॅड. तुषार नागवेकर, विजय नागवेकर, उपाध्यक्ष दिवाकर नागवेकर, जयवंत नागवेकर, राजेंद्र नागवेकर यांच्याबरोबर ग्रामस्थ उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ७०–८० वयातही शिकण्याची धडपड! महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे ‘आजीबाईंची शाळा’; व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल भावूक

नव्या नवरीवर भारी पडला जाऊबाईंचा तोरा! अनुष्कापेक्षा सुंदर दिसते तिची जाऊ; मेघनच्या वहिनीला पाहिलंत का?

Horoscope Prediction : उद्या तयार होतोय गजकेसरी राजयोग; मिथुन राशीबरोबर पाच राशींना लागणार जॅकपॉट !

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

SCROLL FOR NEXT