Kokan
Kokan Sakal
कोकण

रत्नागिरी, सिंधुदर्गातील वीज पुरवठा सुरळीत

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : न्यू कोयना (Koyna) प्रकल्पातून निवळीला जोडणाऱ्या २२५ केवी वीज वाहिनीसह निवळी येथील उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे रत्नागिरी शहरासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरवठा खंडित झाला होता. तीन तास महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात केलेल्या प्रयत्नामुळे रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु निवळी-पावस मार्गावरील वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने रत्नागिरी, राजापूरसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामध्ये मुसळधार पावसाचा व्यत्यय कायम होता.

दोन दिवस कडक उकाडा जाणवत होता. अशातच गुरुवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर परतीच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. गुरुवारी दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. रात्री सात वाजण्याचे सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाल्याचा फटका महावितरणला बसला. न्यू कोयना प्रकल्पातून निवळीला जोडणाऱ्या २२५ केवी वीजवाहिनीसह निवळी उपकेंद्रात बिघाड होऊन रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधील वीज पुरवठा खंडित झाला. मुसळधार पावसात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोयना ते निवळी या मार्गावरील लाईनमध्ये असलेला बिघाड तीन तासात दुरुस्त करून निवळीसह सबस्टेशन मध्ये बिघड काढला. त्यानंतर रत्नागिरी शहरातील वीज पुरवठा सुरळीत झाला.

परंतु निवळी उपकेंद्रतून पावससह सिंधुदुर्गला जोडणाऱ्या लाईनमध्ये झालेला बिघाड काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मुसळधार पावसामुळे त्यामध्ये वारंवार व्यत्यय येत होता. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी, कर्मचारी लाईनमधील बिघाड काढण्यात व्यस्त होते. परंतु पावसाचा अडथळा कायम राहिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT