Konkan esakal
कोकण

'विनायक राऊतांनी आदित्य ठाकरेंकडून मार्गदर्शन घ्यावे'

झारीत अडकलेल्या खासदार विनायक राऊत यांचे प्रबोधन करणे बाकी आहे

राजेश कळंबटे

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प राजापूरात व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांचे प्रबोधन झालं आहे; मात्र झारीत अडकलेल्या खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांचे प्रबोधन करणे बाकी आहे. तेही केले जाईल, असे विधान करत भाजपचे नेते माजी आमदार प्रमोद जठार (pramod jathar) यांनी रिफायनरी समर्थकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. रिफायनरी व्हावी म्हणून विचारांची खोली वाढवण्यासाठी राऊतांनी आदित्य ठाकरेंकडून मार्गदर्शन घ्यावे, असा टोलाही त्यांनी दिला.

भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जठार यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने सकारात्मक विधान करत शिवसेनेला छेडण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रिफायनरी प्रकल्पावरुन शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेनेकडून (shivsena) काहींवर निलंबणाची कारवाई झाली आहे. या परिस्थितीत भाजपचे नेते जठार यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ प्रकल्पाच्या बाजूने असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यावरुन सेना-भाजपमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प खासदार विनायक राऊत यांच्यामुळे होत नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.

यावेळी जठार म्हणाले, सुक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे हे कोकण दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्यामुळे कोकण विकासाचा बॅकलॉग भरुन निघू शकतो. त्यांच्या खात्यामार्फत कोकणात एक हजार छोटे उद्योग सुरु करण्याचा मानस आहे. कोकणातील बेरोजगारी दूर करणे यामुळे शक्य होईल. रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रबोधन झाले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे. मुख्यमंत्रीही तयार आहेत.

स्थानिक आमदार राजन साळवीही रिफायनरीच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत कुठच्या तरी झारीत अडकले आहेत. त्यांचेही प्रबोधन लवकरच केले जाईल. कमीत कमी विस्थापन हा प्रकल्पासाठी महत्त्वाचे आहे. राज्य शासनानेही राजापूर तालुक्यातील बारसू एमआयडीसीसाठी भुसंपादन करण्यास सुरवात केली आहे. त्याच्या आजूबाजूला आठ ते दहा हजार एकर जमीन संपादित करुन तेथे रिफायनरी प्रकल्प होऊ शकतो.

कोयना अवजल रिफायनरीला

कोयनेचे अवजल कोकणासाठी वळवावे यासाठी केंद्र शासनाकडून मदत केली जाईल. हेच पाणी रिफायनरी प्रकल्पाला वापरता येऊ शकते. याबाबत केंद्रीय मंत्री नारायणेच विचार करु शकतात, असेही जठार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT