कोकण

'मला धमक्यांचं फोन येणं हे हास्यास्पद!'- प्रसाद लाड

स्नेहल कदम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर काल महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर काल महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपाच्या काही राणेंच्या वक्तव्याला सहमत नसल्याचे सांगितले. या साऱ्यानंतर आता भाजपाच्या आमदार प्रसाद लाड यांनी एक ट्वीट केलं आहे.

यात ते म्हणतात, खरंतर, मला धमक्यांचे फोन येणे हे हास्यास्पद आहे! परंतु वैचारिक पातळी सोडलेल्या लोकांकडून अजून काय अपेक्षा करू शकतो आपण? त्या अनुषंगाने सन्माननीय मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना याबाबत पत्र लिहून अवगत करणार आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे सरकारचे काम आहे! अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान नारायण राणे यांच्या या प्रकरामुळे राज्यात ठिकठिकाणी आंदोलने आणि दगडफेक झाली. भाजपा-शिवसेना नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. याप्रकरणी 24 तासांच्या आत राणे यांना अटक झाली. मात्र काही वेळातच त्यांना जामीन हा मिळाला. या दरम्यान राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-पुणे फक्त दीड तासात, तर मुंबई-पुणे-बंगळुरू साडे पाच तासात; गडकरींनी सांगितला मास्टरप्लॅन

Petrol Diesel Price Today : पेट्रोल- डिझेलचे दर आज पुन्हा बदलले, तुमच्या शहरात काय आहे ताजा दर? जाणून घ्या एका क्लिकवर

IND vs SA 3rd T20I : गिल, सूर्यकुमारच्या फॉर्मकडे लक्ष; भारत-आफ्रिका यांच्यामध्ये आज तिसरा टी-२० सामना, कशी असेल Playing XI?

Kolhapur IT Park : अखेर कोल्हापूरला ‘आयटी पार्क’चा मार्ग मोकळा! जागा हस्तांतर निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब

ज्येष्ठ लेखक धनंजय चिंचोलीकर उर्फ बब्रूवान रुद्रकंठावार यांचं निधन, वयाच्या ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT