press conference ravindra chavan konkan sindhudurg 
कोकण

कोरोना नियंत्रणात सत्ताधारी अपयशी - चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गात कोरोना स्वॅब टेस्टची सोय नाही. एकूणच कोरोना नियंत्रणात आणण्यामध्ये राज्यशासन सर्वस्तरावर अपयशी ठरले आहे. केंद्राने राज्य शासनाला अनेक सूचना केल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने आज परिस्थिती हाताबाहेर गेली असून राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्यापासून (ता. 22) आंगण ते रणांगण आंदोलन करण्यात येणार असून सिंधुदुर्गातील जनतेनेही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप नेते तथा माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले. 

येथील पालिका लोकमान्य टिळक सभागृहात रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बॅंक संचालक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक नासिर शेख, ऍड. परिमल नाईक, मनोज नाईक, आनंद नेवगी, समृद्धी विर्नोडकर, दीपाली भालेकर, अजय गोंदावळे, परिश्रित मांजरेकर आदी उपस्थित होते. 

श्री. चव्हाण म्हणाले, ""कोकणामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आदी विविध भागांतून चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यांना त्या त्या गावातील शाळेमध्ये तसेच घरामध्ये विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यांची स्वॅब टेस्ट करण्याची यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. रायगड, रत्नागिरीमध्ये आम्ही केलेल्या मागणीनुसार त्या ठिकाणी तत्काळ यंत्रणा उभारण्यात आली. मात्र, सिंधुदुर्गमध्ये कोरोनाबरोबरच माकड तापासारखे संकट असतानाही या ठिकाणी ही व्यवस्था होत नाही, हे दुर्दैवी आहे. विरोधी पक्ष म्हणून लोकशाहीने आम्हाला दिलेल्या अधिकाराचा वापर करीत आम्ही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता आवश्‍यक सूचना राज्य शासनाला करत आलो. मात्र, शासनाने आमच्या सूचनांकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले. जनतेच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष करणाऱ्या राज्य शासनाच्या विरोधात आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली आहे. राज्यातील जनतेने आपल्या कुटुंबासह अंगणात उभे राहून काळ्या फिती बांधून तसेच हातात कागद घेऊन त्यावर आपली मागणी लिहून शासनाचा निषेध व्यक्त करायचा आहे.'' 

कोकणात आज काजूला दर नाही, तर आंब्याला मार्केट नाही. आंबा कॅनिंग दर 35 ते 40 रुपये मिळत होता. मात्र, आज 15 रुपये एवढा दर मिळाला आहे. कोकणी माणूस शेतीवर जगत आहे. मात्र, त्यांच्याबाबतीत उपाययोजना करण्याची गरज असताना शासनाकडून कुठल्याच हालचाली होत नाहीत. पावसाळा तोंडावर आला आहे. 31 मे अगोदर शेतकऱ्यांपर्यंत खते, बियाणे पोचणे गरजेचे आहे. मात्र, हे भात बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे का, ते पुरेसे उपलब्ध झाले आहे का, हे महत्त्वाचे आहे.'' 
- रवींद्र चव्हाण, भाजप नेते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT