कोकण

पंतप्रधानांकडून रत्नागिरीच्या आंबा शेतकऱ्याचे तोंडभरून कौतुक

‘दृकश्राव्या’ द्वारे साधला संवाद; जाणून घेतले अनुभव

राजेश कळंबटे -सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: तुम्ही आईची इच्छा पुरी करत स्वतः यशस्वी उद्योजक बनला आहात. तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक उदाहरण आहात. तुमच्यासारखा उच्च शिक्षित तरुण शेतीकडे वळतो तेव्हा किती मोठे बदल होतात हे तुम्ही दाखवून दिले आहे. तुम्ही फक्त स्वतःच्या कुटुंबाचेच नव्हे तर अन्य सहकारी शेतकऱ्यांचेही भले केले आहे,अशा शब्दात साक्षात पंतप्रधानानी कौतूक करत थेट संवाद साधला. काही क्षण मी दिग्मुढ झालो होतो असे या संवादाचे वर्णन आंबा शेतकरी देवेंद्र झापडेकर यानी केले.

आंबा पिकवण्याच्या केंद्रासाठी पीएम किसान योजनेतून कर्ज घेतलेल्या रत्नागिरीतील आंबा शेतकरी देवेंद्र झापडेकरांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेच्या नवव्या टप्प्याला प्रारंभ झाला असून त्या निमित्ताने मोदीनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे थेट संवाद सोमवारी साधला, पंतप्रधान मोदी म्हणाले,उच्च शिक्षित तरुण शेतीकडे वळतो तेव्हा किती मोठे बदल होतात हे तुम्ही दाखवून दिले आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही शेतीमध्ये मोठा बदल केला.झापडेकरांचे अनुभव अन्य शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरतील, असा विश्‍वासही व्यक्त केला.त्यावेळी झापडेकराना जणू भरून आले.

सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेतलेल्या देवेंद्र झापडेकर यांनी आपल्या वडिलांचा शेतीचा व्यवसाय पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. सरकारी योजनेंतर्गत आंबा पिकवणी केंद्रासाठी (मँगो रायपनिंग चेंबर) कर्ज मिळाले. बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतानाचा अनुभव चांगला असल्याचा अनुभव पंतप्रधाना सांगितला. अन्य शेतकर्‍यांच्या तुलनेत पंतप्रधानानी देवेंद्रशी सहा मिनिटांहून अधिक काळ संवाद साधला.

या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्रकडून त्याच्या उद्योगाविषयीची माहिती जाणून घेतली. उद्योगासाठी ते कसे प्रेरित झाले, बँकांकडून मिळालेले सहकार्य. त्याना मिळालेले यश याची माहिती विचारली. किसान योजनेतून देवेंद्रंनी १६ लाख रुपये कर्ज घेतले होते. कार्बाईड किंवा तत्सम अन्य पदार्थांचा आंबा पिकवण्यासाठी वापर नसल्यामुळे उत्तम फळ ग्राहकांना दिल्याचे समाधान आहे, असे देवेंद्रनी सांगितले. ही संकल्पना कोरोना कालावधीत राबवली.

कृषी विभागासह कर्ज घेण्यासाठी बँकेकडून चांगले सहकार्य मिळाले. दोन आठवड्यात कर्ज मंजूर झाले, असे त्यांनी सांगितले. यावर पंतप्रधान म्हणाले, इतर शेतऱ्यांमध्ये काहीतरी करून दाखवण्याची भावना तुमच्यामुळे जागृत होणार आहे. सहा वर्षांपूर्वी गरीब शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. अनेक अडचणी येत होत्या. आता ती परिस्थिती बदलत आहे. शेतकऱ्‍यांच्या समस्या कमी करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत असल्याचा विश्‍वास पंतप्रधान मोदी यांनी दिला.

नैसर्गिकरीत्या आंबा पिकवता आला

झापडेकर म्हणाले की, आंबा पिकवणी केंद्रामुळे अगदी चार-पाच दिवसांत नैसर्गिकरीत्या आंबा पिकवता आला. पूर्वी पारंपरिक पद्धतीने आंबे पिकवल्यामुळे २०-३० टक्के फळांचे नुकसान होत होते. मात्र, पिकवण केंद्रामुळे पिकांचे नुकसान होत नाही तसेच वेळेचीही बचत होते. दर्जेदार फळ ग्राहकांना दिल्यामुळे दरही चांगला मिळाला.

तुमच्या आईलाही प्रणाम करतो

आंब्याच्या मोसमामध्ये तुम्ही रत्नागिरीत या, असे निमंत्रण देवेंद्र यांनी पंतप्रधानांना दिले. त्यावर मनमोकळेपणाने हसत पंतप्रधान मोदी यांनी धन्यवाद दिले. ते म्हणाले, रत्नागिरीचा आंबा प्रसिद्ध आहे. सध्या रत्नागिरीकर पूरपरिस्थितीमुळे त्रस्त आहात. अति पावसामुळे हैराण झालेला आहात. निमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद देतो तसेच शेतीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या तुमच्या आईला प्रणाम करतो. असेही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

SCROLL FOR NEXT