Problems with Mango Gardeners
Problems with Mango Gardeners 
कोकण

आंबा बागायतदारांनो, हापूसची घ्या काळजी!

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - वातावरणातील बदलांमुळे कोकणातील हापूस उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात अवघ्या दोन ते अडीच हजार पेट्याच वाशी मार्केटला रवाना होत आहेत. कमी उत्पादनामुळे दर चांगला मिळत आहे. बागायतदारांनी सुरवातीला तयार झालेलाच आंबा बाजारात पाठविण्यावर भर दिला तर दर कायमस्वरुपी टिकुन राहणार आहे. कोवळा आंबा बाजारात गेला तर दरावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे.

पावसापाठोपाठ थंडी लांबल्यामुळे आंब्यावर मोहोर येण्याची प्रक्रिया एक महिन्यांनी लांबली. त्याचे परिणाम हापूसच्या उत्पादनावर होत आहे. वातावरणातील बदलांबरोबरच कीडरोगांचाही प्रादुर्भाव काही अंशी ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.

फेब्रुवारी महिन्यात देवगडमधून अधिकाधिक आंबा वाशी मार्केटला पाठविण्यात येतो. त्यात रत्नागिरीचा टक्‍का अत्यंत कमी असतो; परंतु मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये रत्नागिरीचे प्रमाण वाढत जाते. यंदा परिस्थिती गंभीर असून देवगडसह रत्नागिरीतून दररोज सरासरी अडीच हजार पेट्याच वाशीला जात आहे. उत्पादन कमी असल्यामुळे सुरवातीला 4 ते 9 हजार रुपयांपर्यंत पाच डझनच्या पेटीला दर मिळत होता. 

यंदा आंबा हंगाम दीड महिन्यांनी लांबलेला आहे. त्यामुळे बाजारात आंब्याला दरही चांगला मिळतोय. परंतु तयार झालेले फळ बाजारात गेले तर त्याचा दुरगामी फायदा बागायतदारांना मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. 
- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार. 

पिकण्यायोग्य झालेलाच आंबाच... 
तमिळनाडूसह परराज्यातूनही आंबा वाशीला येऊ लागला असून त्याचा दरावर परिणाम होत आहे. त्यामुळे हापूसचा दर्जा टिकवून ठेवण्याचे आव्हान कोकणातील बागायतदारांपुढे आहे. पिकण्यायोग्य झालेलाच आंबा बाजारात पाठविण्याची काळजी बागायतदारांनी घेतली तर वधारलेला दर टिकू शकतो. अन्यथा, त्यात मोठी घट होऊ शकते. 

शेवटच्या टप्प्यातही दर चांगला 
सध्या वाशी बाजारात 3 ते 8 हजार रुपयांपर्यंत दर पेटीला मिळत आहे. यंदा उत्पादन कमी असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातही दर चांगला राहू शकेल, असा अंदाज वाशीतील काही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्याला पूरक अशा गोष्टी बागायतदारांनी स्वतःहून करणे आवश्‍यक आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

Aditya Thackeray: लोकसभेनंतर शरद पवार भाजपसोबत जातील का? विश्वासार्हतेबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT