rate of mango in kokan this year questioning on rate in ratnagiri 
कोकण

लाखमोलाच्या आंब्याच्या दरावर प्रश्‍नचिन्ह; व्यापारी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : हापूसच्या एका पेटीला मुंबईत एक लाख आठ हजार रुपये दर मिळाल्यानंतर अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. लाखमोलाच्या लिलावामुळे घाऊक फळबाजारातील व्यापारी हवालदिल झाले आहेत. बागायतदारांनीही या दरात सातत्य ठेवण्यासाठी मागणी केली आहे. लिलावातील एकाच पेटीला लाखाचा दर, उर्वरित पेटीला तीनपट कमी दर दिल्यामुळे प्रक्रियेवरच बागायतदारांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

जानेवारी महिन्यात मुंबई-पुण्यात देवगडची मुहूर्ताची पेटी आली. त्यानंतर कोकणातून शेकडो पेट्या मुंबईत दाखल होऊ लागल्या. गतवर्षी कोरोनामुळे फळ बाजारावर परिणाम झाला होता. ऐन हापूस आंब्याच्या मोसमात सुरू झालेला हा प्रादुर्भाव कोकणातील हापूस आंबा बागायतदारांच्या जीवावर उठणारा होता. त्या वेळी आंबा बागायतदारांनी थेट विक्रीचा फंडा अवलंबला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यात हापूसची याच पद्धतीने विक्री झाली. त्यामधून कोकणातील आंबा बागायतदारांना चांगला मोबदला मिळाला. याच पद्धतीने यंदाही काही बागायतदारांनी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. मार्च महिन्यात यंदा तुलनेत कमी पेट्या येत आहेत. 

हापूस आंब्याची डिजिटल विक्रीसाठी काही संस्था पावले टाकत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या लिलावात हापूसला मुहूर्ताच्या पेटीला एक लाख आठ हजारांची बोली लागली. एवढा दर प्रथमच मिळाला आहे. मुंबईतील व्यापारी जेवढा दर देतील तेवढा दर बागायतदार आतापर्यंत स्वीकारत होते. यावरुन व्यावसायिकांसह बागायतदारही थोडासा चिंताग्रस्त झाला आहे. लाखमोलाच्या बोलीमुळे व्यापारी दर चांगला देतील असा अंदाज काही जणांकडून व्यक्‍त केला जात आहे; मात्र काही बागायतदारांनी या बोलीवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. बागायतदारांकडून लिलावात मिळालेल्या दराप्रमाणेच दर मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्‍त केली आहे.

"हापूसच्या एका पेटीला एक लाख आठ हजारांचा दर मिळाल्याबद्दलल नवीन कंपनीचे अभिनंदन. या दरामध्ये सातत्य राहावे ही अपेक्षा. जेणेकरून कोकणातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल."

- संजय पानसरे, व्यावसायिक, वाशी

"सध्या बाजारात हापूसच्या पेटीला दोन ते चार हजार रुपये दर आहे. आम्हाला लाखाचा दर नको; पण किमान शेतकऱ्याने केलेला खर्च भागेल अशी व्यवस्था झाली तरी चांगले आहे. दराबाबत स्टंटबाजी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे."

- राजेंद्र कदम, बागायतदार, रत्नागिरी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

रितेश देशमुखची शाळा पाहिलीत का? ना मुंबई, ना लातूर; 'या' ठिकाणी शिकलाय अभिनेता, मैदान पाहाल तर पाहतच राहाल

Latest Marathi News Updates : पंजाबच्या पुरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

Sillod Rain : तीन तासाच्या पावसाने सर्वत्र दाणादाण; आमठाणा मंडळात 70 मिलिमीटर पाऊस, नऊ गावांचा काही तासासाठी तुटला संपर्क

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

SCROLL FOR NEXT