कोकण

देश रक्षणार्थ रत्नागिरी जिल्ह्याचे योगदान

मुझफ्फर खान

चिपळूण - स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो तरुणांनी सैन्यात आपले योगदान दिले आहे. जिल्ह्यातील ३५ जवानांना आतापर्यंत वीरमरण आले.
सैन्यातून निवृत्त झालेल्या जवानांपैकी ३८६३ जवान हयात आहेत तर ३८२१ मरण पावले आहेत. जिल्ह्यातील हजारो जवान सीमेवर तैनात आहेत.

रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण मंडळातून याबाबत माहिती देण्यात आली. स्वातंत्र्यलढ्यात जसे रत्नागिरी जिल्ह्याचे योगदान आहे तसे स्वात्रंत्र्यप्राप्तीनंतर हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील हजारो तरुण सैन्यात भरती झाले. वेळप्रसंगी बलिदानही दिले आहे तर काही जखमी झाले.आजही हजारो तरुण सैन्य दलात कार्यरत आहेत. 

देशसेवा करताना ३५ जवान ठिकठिकाणी शहीद झाले त्यात ३ वीरपुत्रांचा समावेश आहे.  शिरगाव (ता. चिपळूण) येथील संतोष शिंदे १९९८ मध्ये काश्‍मीरच्या सीमेवर पाकिस्तानच्या सैनिकांशी लढताना शहीद झाले.

१९७१ च्या युद्धात मोरवणे येथील रामचंद्र गणपत शिंदे शहीद झाले होते. २००८ मध्ये दापोली येथील जवान तुकाराम बोईटे आणि धामणंदचे उत्तेकर देशसेवा करताना शहीद झाले. मंडणगड तालुक्‍यातील राजेंद्र यशवंत गुजर हे भारतीय वायूदलात पायलट फ्लाईंग लेफ्टनंट पदावर कार्यरत होते.
आसाममधील मापूम पारे जिल्ह्यात देशसेवा करत असताना ४ जुलै २०१७ ला ते शहीद झाले. पाचल (ता. राजापूर) येथील कॅप्टन प्रेमकुमार पाटील ऑगस्ट २०१५ मध्ये काश्‍मीरच्या सीमेवर शहीद झाले. 

देशभक्तीची जाणीव व्हावी, या हेतूने देवरूख येथे कोकणातील पहिले शहीद जवान स्मृती स्मारक उभारले आहेत. खेड तालुक्‍यातही असे स्मारक उभे राहावे, अशी आमची मागणी आहे.
- जयवंत शिंदे, मोरवणे, ता. खेड

घरटी एक माणूस सैन्यामध्ये 
खेड तालुक्‍यातील तिसंगी, मोरवणे, धामणंद, शिवथर ही गावे सैनिकांची गावे म्हणून ओळखली जातात. या गावातील घरटी एक माणूस सैन्यामध्ये आहे. दुसऱ्या महायुद्धात शिवथर गावातील शंभरहून अधिक जवान शहीद झाले होते. त्यांचे स्मारकही बांधण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT