sakal
कोकण

समुद्रकिनाऱ्यावरील अस्वच्छता पाहून पर्यटकांनी फिरवली पाठ

किनाऱ्यावर दुर्गंधी; पर्यटक फिरतात माघारी

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी शहर व परिसर हा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारा आहे. मनमोहक नैसर्गिक सौंदर्य आणि समुद्रकिनारे हे पुण्यामुंबईसह राज्यभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. कोरोनानंतर आता हळूहळू पर्यटन सुरू होत आहे. परंतु गेट वे ऑफ रत्नागिरी म्हणून ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या मांडवी समुद्रकिनाऱ्यावर मात्र गटाराचे पाणी वाहत असल्यामुळे या परिसरात पर्यटक फिरण्यास येत नाही. अस्वच्छता पाहून काही पर्यटक चक्क वाईट शब्दांत बोलतात आणि निघून जातात, अशा गलिच्छ वातावरणामुळे पर्यटन वाढणार कसे? हा प्रश्न आहे.

मांडवी जेट्टी परिसर, समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. त्यामुळे लाखो पर्यटक या किनाऱ्यावर येऊन जातात. गणेश विसर्जन असो वा दसऱ्याला देवींचे विसर्जन असो येथे गर्दी पाहायला मिळणारच. या किनाऱ्यावर विविध व्यवसाय करून अनेक लोक आपली उपजीविका करतात. यामध्ये भेळ, स्नॅक्स सेंटरचालक, लहान मुलांची खेळणी चालक, घोडेस्वार, उंट सफारी, फुगेवाले आणि अनेक प्रकारची खेळणी विक्रेता तसेच भुईमुगाच्या शेंगा विक्रेते असे अनेक जणांचा समावेश आहे. परंतु किनाऱ्यावरील अस्वच्छतेमुळे त्यांच्या विक्रीवरही परिणाम होत आहे. गटारातून येणारे सांडपाणी थेट किनाऱ्यावर येत असल्यामुळे पर्यटक फक्त किनाऱ्याचे दर्शन घेऊनच परत जात आहेत.

पर्यटक आल्या पावली परत

जागतिक पर्यटन दिनानिमित्त २७ सप्टेंबरला रत्नागिरी पर्यटन सेवा सहकारी संस्थेतर्फे पर्यटन महोत्सव साजरा झाला. यात जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी झाले. पर्यटन वाढण्यासाठी काय केले पाहिजे, यावर त्यात मंथन करण्यात आले. परंतु, रत्नागिरी शहरातील मांडवी पर्यटनस्थळाची परिस्थिती पाहिल्यानंतर पर्यटक आल्या पावली परत जात असल्याने सुधारणेची गरज आहे. नगरपालिकेने यावर तत्काळ गटाराची सफाई किंवा पाईपलाईन दुरुस्ती करण्याची मागणी येथील काही लोकांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT