ratnasagar beach resort seal in ratnagiri order of collector in ratnagiri 
कोकण

कोकण : रत्नसागर बिच रिसॉर्ट केले सील

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये समुद्र किनारी असलेल्या ‘रत्नसागर बिच रिसॉर्ट’ला आज जिल्हा प्रशासनाने सील केले. सप्टेंबरमध्ये या रिसॉर्टचा करार संपल्याने ते सील केले आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीने ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देता येईल का ? याचा विचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

भाट्ये समुद्रकिनारी आलिशान रत्नसागर बीच रिसॉर्ट उभारण्यात आले. तत्कालीन पर्यटन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाट्येची ही शासकीय जागा करारावर घेऊन हे आलिशान रिसॉर्ट बांधले. छोट्या-छोट्या एसी, नॉन एसी रुम बांधल्याने देश-विदेशातील पर्यटकांनी त्याला चांगली पसंती दिली. पर्यटन वाढीला या रिसॉर्टचा चांगला फायदा झाला. मात्र स्थानिक ऑनलाईन बुकिंमुळे स्थानिक काम आणि बाहेरचे पर्यटक येथे अधिक येतात. 

प्रशस्त जागा असल्याने वेगवेगळ्या कंपन्यांचे अनेक कार्यक्रम येथे होतात. या रिसॉर्टमुळे सुरवातीला स्थानिक पातळीवर काहीसा विरोध झाला होता. मात्र तो लगेच मावळला. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, रिसॉर्ट मालकाचा जिल्हा प्रशासनाच्या या जागेशी झालेला करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे रत्नसागर बीच रिसॉर्टला आम्ही सील केले आहे. मोठी जागा आणि तयार स्ट्रक्चर आहे. पर्यटनवाढीला त्याचा फायदा व्हावा, या अनुषंगाने ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देण्याचा विचार आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

SCROLL FOR NEXT