Release of children from father's persecution konkan sindhudurg 
कोकण

पोलिसांचा सहृदयीपणा; दक्षतेमुळे दोन जीवांना मिळाले पुन्हा मातृछत्र

अर्जुन बापर्डेकर

आचरा (सिंधुदुर्ग) - पतीच्या जाचाला कंटाळून पाच वर्षांपूर्वीच घर सोडलेल्या आईच्या मायेला पोरकी झालेल्या दोन मुलांना मद्यपी बापही त्रास देऊ लागला. मायेची नाती जीवावर उठल्याने सहनशीलता संपलेल्या एका मुलाने घर सोडले. पोलिसपाटलांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे मुलाला मातृछत्र मिळाले. शिवाय दारुड्या बापामुळे आयुष्य उद्‌ध्वस्त करायला निघालेल्या मुलाला चांगल्या मार्गावर आणले. या सर्व प्रकरणात पोलिसांच्या मात्र सहृदयीपणाचे दर्शन झाले. 

चिंदर गावातील एक पंधरा वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसपाटील दिनेश पाताडे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांना दिली. याबाबत नातेवाईकांनी तक्रारही दाखल केली नव्हती; पण एवढ्या लहान वयात मुलगा घरातून पळून का गेला? याबाबत कळेकर यांनी तपासाचे आदेश दिले. हवालदार सुनील चव्हाण, अक्षय धेंडे, कांबळे यांनी तपास सुरू करताच मुलांच्या वडिलांचे प्रताप उघड झाले. 

पोलिसांनी सांगितले, की व्यसनामुळे पती मारहाण करत असल्याने पत्नीने घर सोडले. आपला छोटा भाऊ आणि आजी-आजोबांसोबत राहणारा हा मुलगा मुळातच अभ्यासात हुशार होता; पण वादन, पोहण्यातही तरबेज होता. खेकडे पकडण्यातही तो हुशार होता; मात्र त्याने पकडून आणलेले खेकडे विकून दारू पिणे एवढेच वडिलांचे काम. दारू पिल्यानंतर वयोवृद्ध आई-वडिलांसह या मुलांनाही तो मारहाण करीत असे. त्यामुळे मोठ्या मुलाने घर सोडल्याची माहिती समजल्याने पोलिसांनी या मुलाचा शोध सुरू केला. काहींनी त्या मुलाबाबत माहिती गोळा केली.

चिंदर ग्रामस्थ दीपक सुर्वे यांना देवगडमध्ये एक मुलगा अंगणात झोपल्याची माहिती कुणीतरी दिली. बेपत्ता तोच मुलगा असल्याचे समजताच त्याला पोलिस स्टेशनला आणले. मुलाला वडिलांच्या ताब्यात दिल्यास त्याचे आयुष्य उद्‌ध्वस्त होईल, ही भीती होती. यामुळे कळेकर साहेबांनी सदर मुलांच्या आईशी सातारा येथे संपर्क साधला. सदर महिला पतीचे घर सोडून गेल्यानंतर न खचता साताऱ्यात नोकरी करत असल्याचे समजले. मुलांना सोबत आणण्याचा प्रयत्न होता; पण पतीचा विरोध होता, हे तिच्याकडून समजले. दोन मुलांची जबाबदारी घेण्यास ती समर्थ असल्याने या मुलांना तिच्या ताब्यात देण्याचा निर्णय कळेकर यांनी घेतला. 

उद्‌ध्वस्त होता होता वाचले 
पोलिस स्टेशनला तक्रार दाखल होण्याची वाट न बघता पोलिसपाटलांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहकाऱ्यांच्या साथीने त्या मुलाचा वेळीच शोध आचरा पोलिसांनी घेतल्याने कोवळ्या वयातच आयुष्य उद्‌ध्वस्त होता होता वाचले. शिवाय मुलांना पुन्हा मातृछत्र मिळवून देण्याचे काम आचरा पोलिसांनी केले. त्यांच्या या सहृदयपणामुळे कोवळ्या जीवांना मायेचे छत्र मिळाले.  

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT