reservation of sarpanch of gram panchayat in ratnagiri
reservation of sarpanch of gram panchayat in ratnagiri 
कोकण

सरपंचपदाची आरक्षण सोडत २५ जानेवारीला

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या 15 ला मतदान होणार असून आता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सरपंचपदाची आरक्षण सोडत 25 जानेवारीला काढण्याचे निश्‍चित केले आहे. सोडत सकाळी अकरा वाजता तालुक्‍याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी काढणार आहे. 

निवडणुकीपूर्वी सरपंचपदाची सोडत काढण्यात येते; मात्र निवडणुकीतील घोडेबाजार थांबवण्यासाठी ही सोडत मतदान व निकालानंतर काढण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ग्रामविकास विभागाच्या 6 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार सरपंचपदाचे आरक्षण निश्‍चित केले आहे. मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियम 2- अ (1)(2) नुसार पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी कोटा निश्‍चित केला आहे. 

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या घोषित निवडणूक कार्यक्रमाच्या मतदानानंतर सरपंच आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सरपंच आरक्षण कार्यक्रमाबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत आणि पुर्नवसन यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्यविषयी सूचना व आदर्श कार्यप्रणाली संहिता, कार्यालयाकडील 2 डिसेंबर 2020 रोजीच्या अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना विचारात घेऊन सरपंच आरक्षण कार्यक्रमाबाबत कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT