reservation of sarpanch of gram panchayat in ratnagiri 
कोकण

सरपंचपदाची आरक्षण सोडत २५ जानेवारीला

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या 15 ला मतदान होणार असून आता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सरपंचपदाची आरक्षण सोडत 25 जानेवारीला काढण्याचे निश्‍चित केले आहे. सोडत सकाळी अकरा वाजता तालुक्‍याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी काढणार आहे. 

निवडणुकीपूर्वी सरपंचपदाची सोडत काढण्यात येते; मात्र निवडणुकीतील घोडेबाजार थांबवण्यासाठी ही सोडत मतदान व निकालानंतर काढण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ग्रामविकास विभागाच्या 6 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार सरपंचपदाचे आरक्षण निश्‍चित केले आहे. मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियम 2- अ (1)(2) नुसार पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी कोटा निश्‍चित केला आहे. 

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या घोषित निवडणूक कार्यक्रमाच्या मतदानानंतर सरपंच आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सरपंच आरक्षण कार्यक्रमाबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत आणि पुर्नवसन यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्यविषयी सूचना व आदर्श कार्यप्रणाली संहिता, कार्यालयाकडील 2 डिसेंबर 2020 रोजीच्या अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना विचारात घेऊन सरपंच आरक्षण कार्यक्रमाबाबत कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT