Rice harvesting at Sindhudurg 
कोकण

पावसाच्या सावटात भातकापणीची घाई 

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - परतीच्या पावसाने परिपक्व झालेली भातशेती कापणी लायक बनली आहे; मात्र परतीच्या पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे बळीराजा चिंतेत आहे. भात कापणीच्या हंगामाकडे आता शेतकऱ्यांनी मोर्चा वळविला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात प्रमुख पीक म्हणून भातशेतीकडे पाहिले जाते. जिल्ह्यात 63 हजार 700 हेक्‍टर भात लागवडीचे उद्दिष्ट होते. 

यामध्ये 5 हजार 214 हेक्‍टरवर भात बियाण्यांची पेरणी केली होती. यात संकरित, सुधारित आणि पांरपरिक बियाण्यांचा समावेश होता. जमिनीच्या पोतप्रमाणे भात बियाण्यांची पेरणी आणि रोपांची लागवड केली जाते. अलीकडच्या काळात सुधारित आणि संकरित बियाणे पेरणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. गेले काही दिवस हवामानातील बदलांचा परिणाम शेतीवर होत आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजा भात कापणीच्या तयारीत असताना अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरीने शेतकरी चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वी कोसळत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. भातशेतीत पावसाचे पाणी शिरल्याने उभी असलेली भातशेती आडवी झाली आहे. 

भातशेती चांगली परिकत्व झाली आहे. काही ठिकाणी फुलोऱ्यावर आलेली भातशेती पिवळी धमक होत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी झाला होता. पडणाऱ्या अधून-मधून पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 
जुलैच्या पहिल्या आठवड्यात भातरोपे लागवडीस पोषक पाऊस पडल्यामुळे गती मिळाली. 20 जुलैपर्यंत जिल्ह्यात 44 हजार हेक्‍टर क्षेत्रावर भात लागवडीचे काम पूर्ण झाले होते. 27 जुलैला 55 हजार हेक्‍टरवर भात लागवडीचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. रोहिणी नक्षत्रात यंदा पावसाने सलामी दिली होती. यावर्षी समाधानकारक असेल असा अंदाज होता. 

यंदाही संकटे 
पावसाने सातत्य राखल्याने भातशेती चांगली फुलोऱ्यात आली होती. कोसळलेल्या पावसाने शेतात उभी असलेले भातपिक आडवे झाले. गतवर्षी प्रमाणे यंदाही बळीराजा संकटात सापडला आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने पिवळी धमक झालेली भातशेती बळीराजा कापण्याच्या तयारीत असताना अधून-मधून पडणाऱ्या पावसाने सरीने बळीराजाची चिंता सतावू लागली आहे. 

मजुरांचा शोध 
हळव्या व निमगाव भाताची आता कापणी होणार आहे. ढगाळ वातावरण पाहता शेतीचे नुकसान न होणे यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोर्चा भातकापणीकडे वळविला आहे. या आठवड्यामध्ये भात कापणीला हळूहळू वेग येणार आहे. त्यामुळे परिपक्व झालेले भात पावसाच्या घशात पडू नये, यासाठी मजुरांचे शोधाशोध होऊ लागली आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी 75 एकर जागेचा मार्ग मोकळा! निवृत्त सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत कार्यक्रम; 16 ऑगस्टला होणार मोठी घोषणा?

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : बावनकुळेंचे स्वातंत्र्यदिनी विकसित महाराष्ट्राचे आवाहन

SCROLL FOR NEXT