vaibhav naik sakal
कोकण

‘सकाळ’ने जपली विश्‍वासार्हता; आमदार वैभव नाईक

‘सकाळ’ कणकवली कार्यालयाचा वर्धापन दिन

सकाळ वृत्तसेवा

कणकवली : समाजाच्या सकारात्मक बदलाबरोबरच ‘सकाळ’ने विश्वासार्हता जपली आहे. समाजप्रबोधनासोबतच जिल्ह्याच्या विकासासाठी लावलेला हातभार हा कौतुकास्पद आहे. ‘संस्कृती’ या विशेष पुरवणीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी प्रोत्साहन देणारे लिखाण ‘सकाळ’ने मांडून नव्या पिढीतील तरुणांना व्यवसायासाठी दिलेले बळ ही ‘सकाळ’ची वेगळी ओळख आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.

सकाळ कणकवली विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन आज कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक कै. नानासाहेब परुळेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. वर्धापन दिनाचे औचित्‍य साधून ‘संस्कृती’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन आमदार नाईक, कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वृत्तपत्र विक्रेते मालोजी कोकरे, अनिल ठाकूर, अभिजित सावंत, तसेच ‘सकाळ’ कार्यालय कणकवलीचे जाहिरात विभागाचे वरिष्ठ प्रतिनिधी भास्कर रासम, वितरण प्रतिनिधी कुंदन पिळणकर, बातमीदार तुषार सावंत, राजेश सरकारे, प्रशांत हिंदळेकर, वैभव किंजवडेकर आदी उपस्थित होते. बातमीदार तुषार सावंत यांनी आभार मानले.

‘संस्कृती’ पुरवणीचे प्रकाशन, अन्‌ कौतुक

बातमी देताना ‘सकाळ’ तडजोड करत नाही. बातमीमध्ये एकतर्फी बाजू कधीच घेतली जात नाही. सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभाग राहिला आहे, असे अशोक करंबेळकर यांनी सांगितलेे. दरम्यान, ‘संस्कृती’ या िवशेष पुरवणीचे प्रकाशन झाले. पुरवणी वाचनीय झाल्याचे सांगत मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT