कोकण

समुद्र कोपला, भाट्येकिनारी तीन मीटर आत घुसला... किती झाले नुकसान, काय आहे धोका वाचा

राजेश शेळके

रत्नागिरी : उच्चतम भरतीच्या वेळी भाट्येकिनारी समुद्राचे अतिक्रमण झाले असून त्यात किनाऱ्यावरील रत्नसागर बीच रिसॉर्टच्या 35 नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे. समुद्र तीन मीटर आत घुसला असून अर्धा किलोमीटर भागाची धूप झाली आहे. भविष्यात चाळीस नारळाच्या झाडांना धोका असून सलग दुसऱ्या वर्षी पावसाळ्यात भाट्ये किनाऱ्यावर हा प्रकार घडला आहे. 

भाट्ये किनाऱ्यावर झरीविनायक मंदिराच्या बाजूला रत्नसागर बीच रिसॉर्टमध्ये नारळासह विविध झाडे लावण्यात आली आहेत. समुद्राच्या लाटा रिसॉर्टच्या बाजूने आतमध्ये घुसत होत्या. लाटा किनाऱ्यावर तीन मीटर आतमध्ये आल्या आहेत. येथील वाळू पाण्याच्या वेगाने समुद्राच्या दिशेने वाहून जात होती. भरतीच्या लाटा वाढू लागल्यानंतर एक-एक नारळाची झाडे कोसळू लागली. एकापाठोपाठ एक सुमारे 35 नारळाची झाडे पडली. झाडावरील लागलेले नारळ समुद्राच्या पाण्यात पडून वाहून गेले. येथील काही झाडे वाकली असून ती केव्हाही कोसळतील अशी परिस्थिती आहे. सुमारे चाळीस झाडांना भविष्यात धोका आहे. समुद्राच्या लाटांचे तांडव पाहणाऱ्या रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनीही यंदा प्रथमच अशा प्रकारे लाटांचा जोर पाहायला मिळाल्याचे सांगितले. 

कृषी विभागाच्या अंदाजानुसार, एका झाडाचे नुकसान किमान अडीच हजार रुपये आहे. भविष्यात त्यापासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेतले तर सर्व झाडांचा मिळून सुमारे एक ते दीड लाख रुपयांचा फटका बसला आहे. 

पूर्वी भाट्येकिनारी रिसॉर्टच्या अर्धा किलोमीटर भागामध्ये वाळूचा नैसर्गिक बंधारा होता. तो सुमारे तीन फूट उंच होता. हा प्रकार घडल्यानंतर प्रशासनाकडून झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. पावसाळ्यात दरवर्षी रत्नागिरी तालुक्‍यातील मिरकरवाडा, काळबादेवी, मांडवी किनारी समुद्राच्या उधाणाचा तडाखा बसत आहे. यंदाही मिऱ्या येथे किनाऱ्यावर भगदाड पडले आहे. 

गेल्या वर्षीही धूप 
गतवर्षी भाट्येतील काही सुरूची झाडे, स्मशानभूमीचा भाग आणि किनाऱ्यावरील वॉच टॉवरचा भाग वाहून गेला होता. यंदा दिशा बदलली. झरीविनायक मंदिराकडील भागात लाटांचा अधिक जोर होता. अजून अमावास्या आणि पौर्णिमेची भरती येणार आहे. अनेकांनी पडलेल्या झाडांसोबत सेल्फी काढले. 

समुद्राच्या उधाणामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. लाटांच्या पाण्यात नारळाची झाडे वाहून गेली असून भविष्यात काही झाडांनाही धोका निर्माण झाला आहे. 
- माधव बापट, मंडळ कृषी अधिकारी 


संपादन ः विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Kolhapur Dussehra : कोल्हापूरसाठी 'हा' कसला मानाचा तुरा, म्हणे राज्याचा प्रमुख महोत्सव; शाही दसऱ्यासाठी निधीच नाही

World Wrestling Championship 2025 : भारताच्या सुजीतची कडवी झुंज अपयशी, ऑलिंपिक विजेत्या रहमानचा ६-५ने विजय

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

SCROLL FOR NEXT