sharad pawar uddhav thackeray esakal
कोकण

Jayant Patil: ठाकरेंनी तिसरा उमेदवार दिला, शरद पवार नाराज? जयंत पाटलांनी सांगितलं निवडणुकीत गेम कसा झाला?

Jayant Patil News in Marathi: जयंत पाटील यांनी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप केला आणि पराभवाचे खापर उबाठा शिवसेनेवर फोडले.

Sandip Kapde

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला. जयंत पाटील यांना या निवडणुकीत मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. जयंत पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पाठिंबा दिला होता.

मात्र, शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी देत जयंत पाटील यांना मदत करण्यास नकार दिल्याची चर्चा होती. यामुळे एकूणच महाविकास आघाडीतील बिघाडी आणि शिवसेना व शरद पवार यांच्यातील तणाव चर्चेत आला आहे.

मतांचा कोटा आणि पराभव-

जयंत पाटील यांना विधानपरिषद निवडणुकीत १२ मतं मिळाली. ही १२ मतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या १२ आमदारांची असल्याचा अंदाज बांधला जात होता. जयंत पाटील यांनी अलिबाग येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना विधान परिषदेतील आपल्या पराभवाचे विस्तृत विश्लेषण केले.

जयंत पाटील यांनी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप केला आणि पराभवाचे खापर उबाठा शिवसेनेवर फोडले. महाविकास आघाडीच्या दोनच उमेदवार देण्याच्या निर्णयात शिवसेनेने तिसरा उमेदवार दिला, यामुळे शरद पवार नाराज झाल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीतील मतांचे गणित कसं होतं-

महाविकास आघाडीतील काँग्रेसचे ३७ आमदार, ठाकरे गटाचे १२ आमदार, आणि शरद पवार गटाचे १५ आमदार होते. शरद पवार गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे जयंत पाटील यांची १६ मते निश्चित होती. विजयासाठी आवश्यक असलेल्या २३ मतांसाठी अधिकच्या ७ मतांची गरज होती. मात्र, अपेक्षित मतांपेक्षा ४ तर एकूण ११ मते कमी पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT