Sindhudurg BJP Will lead in Ratnagiri  
कोकण

रत्नागिरीतील भाजपचे नेतृत्व सिंधुदुर्गकडे ?

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात मिळून एकमेव जागा सिंधुदुर्गात नितेश राणेंच्या रुपाने भाजपला मिळाली आहे. एकेकाळी रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार होते; मात्र आता एकही आमदार राहिलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनाच मोठा भाऊ असून प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपकडून झालेल्या चुकांमुळे शिवसेना किती समजून घेईल, याबाबत साशंकताच व्यक्‍त केली जात आहे. दोन्ही जिल्ह्यात एकाच जागेवर भाजपचा आमदार आहे. त्यामुळे भाजपचे नेतृत्त्व सिंधुदुर्गकडे राहण्याची शक्यता वाढली आहे. 

जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील चार शिवसेनेकडे आहेत तर एक राष्ट्रवादीने राखण्यात यश मिळवले. महायुतीच्या जागा वाटपात जिल्ह्यात एकही जागा भाजपला सोडण्यात आलेली नव्हती.

उलट आघाडीमध्ये राजापूरची जागा काँग्रेसने लढवली. त्या ठिकाणी काँग्रेसच्या लाड यांना मिळालेली मते लक्षणीय असून भविष्यात त्याचा फायदा पक्षवाढीला होणार आहे. या उलट परिस्थिती भाजपची झालेली आहे. रत्नागिरीत एकही जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यातच राज्यात भाजपच्या जागा घटल्या असून शिवसेनेकडून दबाव तंत्राचा वापर सुरू झाला आहे. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटणार हे निश्‍चितच आहेत. 

दापोली भाजपकडून शिवसेनेला झालेला विरोध, चिपळुणातील पराभवाच्या कारणातही साथ न मिळाल्याचा असलेला संशय, गुहागरमध्येही गटातटामुळे राष्ट्रवादीच्या सहदेव बेटकरांना मिळालेले मताधिक्‍य या गोष्टी भविष्यातील भाजपच्या वाटचालीला अडचणीच्या ठरणाऱ्या आहेत. भाजपकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा नेतृत्वात बदल केल्यामुळे ती जबाबदारी जिल्हाध्यक्षावर पडणार आहे.

निवडणुकीप्रसंगी भाजपमधील बंडोबांना थंड करण्यासाठी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी यशस्वी प्रयत्न केले; मात्र आता पुढील वाटचाल करताना दापोली, गुहागर, चिपळूण आणि राजापुरात भाजप नेतृत्वाला शिवसेनेकडून कशा पद्धतीने वागणूक मिळणार हा संशोधनाचा मुद्दा झाला आहे.

सिंधुदुर्गकडे नेतृत्व?
रत्नागिरी, सिंधुदुर्गातील आठ पैकी एकाच जागेवर भाजपचा आमदार आहे. नीतेश राणेंच्या रुपाने हे आव्हान जिवंत राहिले आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचे नेतृत्व सिंधुदुर्गकडे राहण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. नीतेश यांनीही विजयानंतर दोन्ही जिल्ह्यात भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने श्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray: कोण होत्या मीनाताई ठाकरे? बाळासाहेबांच्या झंजावात राजकारणात होता सिंहाचा वाटा

Nagpur Municipal Corporation: 'नागपूर मनपा निवडणुकीला महागाईचा फटका'; २० कोटींचा अंदाजित खर्च, २४ लाखांहून अधिक मतदार

Nano Banana AI Durga Puja 2025 Saree Look Prompts: 'हे' 5 प्रॉम्प्ट कॉपी करा अन् जनरेट करा फेस्टिव्हल साडी लूक

Bhosari MIDC : भोसरी एमआयडीसी पोलिसांचा पर्यावरणासाठी पुढाकार, देशी वृक्षांची लागवड

Mumbai Local Viral Video: दिव्यांगजन कोचमध्ये सामान्य प्रवाशांची घुसखोरी, आरक्षित डब्ब्यात चढण्यासाठी दृष्टिहीनांचे हाल

SCROLL FOR NEXT