कोकण

खासदार राऊत यांनी एकतरी प्रकल्प आणला का? - प्रमोद जठार

सकाळवृत्तसेवा

कणकवली - सर्वच प्रकल्पांना विरोध करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी गेल्या तीन वर्षांत एक तरी प्रकल्प आणला का? याचे उत्तर जनतेला द्यावे. शिवसेनेचे मंत्री आणि आमदार यांच्या अंतर्गत कलहामुळे रिफायनरी प्रकल्पाला विरोध होत आहे, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केली. येथील भाजप कार्यालयात जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी डामरे सरपंच चंद्रहास सावंत उपस्थित होते.

जठार म्हणाले,‘‘खासदार राऊत आणि शिवसेनेच्या इतर मंडळींनी कोकणात होणाऱ्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचा आधी नीट अभ्यास करायला हवा. त्यांना विकासाचा एकही प्रकल्प आणता येत नसेल तर आलेल्या प्रकल्पांना विरोध तरी करू नये. सध्या शिवसेना म्हणजे कोकण विकासाच्या आड आलेले मांजर आहे.

ते म्हणाले,‘‘ग्रीन रिफायनरी प्रकल्पातून दीड लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. केंद्र सरकारच्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तीन कंपन्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प होत आहे. या प्रकल्पातून किमान एक लाख रोजगार संधी निर्माण होणार आहे. परंतु अपूर्ण माहितीच्या आधारे शिवसेनेचे खासदार व इतर मंडळी त्याला विरोध करीत आहेत.ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मंजूरी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. हे शिवसेनेचे मंत्री आहेत, जर शिवसेनेची या प्रकल्पाला विरोधाची भूमिका असेल तर त्यांनी आधी उद्योगमंत्री देसाई यांचा राजीनामा घ्यावा असे, जठार म्हणाले. शिवसेना पक्षात विधान परिषदेतील आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली. तर निवडून आलेल्या आमदारांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. त्यामुळे विधान परिषद आणि जनतेमधून निवडून आलेल्या शिवसेना आमदारांत वाद आहेत. या अंतर्गत वादातून रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला जात आहे.

शिवसेनेने एन्‍रॉन प्रकल्पाला तीव्र विरोध केला. सेटलमेंट झाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्याच धर्तीवर शिवसेनेचा ग्रीन रिफायनरीला विरोध आहे. परंतु रिफायनरी प्रकल्प हा केंद्र सरकारचा असल्याने तेथे सेटलमेंटला वाव नाही हे शिवसेनेच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे. तसेच प्रकल्पाला विरोध करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी एक तरी प्रकल्प सुरू करून दाखवावा असे आव्हान जठार यांनी दिले.

फुकाचे श्रेय घेऊ नका...
आनंदवाडी बंदर प्रकल्पासाठी सन २००९ पासून आम्ही प्रयत्न करीत आहेत. या प्रकल्पाची खासदार विनायक राऊत यांनी वाटच लावली होती. परंतु केंद्रात नितीन गडकरी असल्याने हा प्रकल्प वेगाने मार्गी लागला. मात्र या प्रकल्पाचे फुकाचे श्रेय शिवसेना घेत आहे, असेही श्री. जठार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT