smell of cultivation of one crop in konkan ratnagiri production profit 
कोकण

‘पचौली’ने शेतकऱ्यांचे अर्थकारण सुगंधित; कोकणात यशस्वी प्रयोग

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : नेहमीच शेती उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या आडे, पाडले येथील शेतकऱ्यांनी आगळा प्रयोग करून दाखवला आहे. येथील भार्गवराम शेतकरी गटाने लागवड केलेली सुगंधी पचौली वनस्पती साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. पचौलीच्या सुगंधी तेलाला साडेतीन ते चार हजार रुपये किलो असा भरघोस भाव मिळू शकतो. पचौली ही सुगंधी औषधी वनस्पती कोकणातील शेतकऱ्यांना वरदान ठरत असून ही लागवड कोकणातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नाचे साधन निर्माण करणारी ठरत आहे. आडे तसेच पाडले येथील मिलिंद लिमये, चंद्रशेखर लिमये व शिरीष बिवलकर यांच्यासह श्री भार्गवराम शेतकरी गटाने पचौली वनस्पतीची लागवड केली.

लागवड नारळ, पोफळीच्या बागेत, भातशेतीत तसेच आंबा बागेतही करता येते. पावसाळ्यात बुंध्याजवळ पाणी साचणार नाही, अशा जागेची निवड करण्यात आली असून बागायती क्षेत्रात आंतरपीक म्हणून केलेली लागवड फायदेशीर ठरत आहे. याचे उत्पन्नही साडेतीन ते चार महिन्यात मिळते. साडेतीन ते चार महिन्यांनी पचौलीची पाने कापून सावलीत वाळवून त्यांचा तेल काढण्यासाठी वापर केला जातो. या तेलाला चांगला भाव मिळत असल्याने या वनस्पतीवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा परिसरातच उभी करणार आहेत. यामुळे खरेदीची हमीसुद्धा शेतकऱ्यांना मिळणे शक्‍य होणार आहे, असे लिमये यांनी सांगितले. पचौली वनस्पतीची लागवड पावसाळा संपल्यानंतर लगेच केली तर वर्षभरात तीन बहर या पानांचे मिळतात. त्यानंतर पाने काढून त्याच्या फांद्यांच्या वापर नवीन लागवडीसाठी रोपे करण्याकरता करता येतो.

साडेतीन ते चार हजार रुपये किलो 

पचौलीच्या सुगंधी तेलाला साडेतीन ते चार हजार रुपये किलो असा भरघोस भाव मिळत असल्याचे चंद्रशेखर लिमये यांनी सांगितले. आमच्याकडे कच्चा माल सध्या तयार असून यापासून तेल काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या तेलाचा अर्क तपासणीसाठी मुंबई येथील जागतिक दर्जाच्या ॲनाकेम लॅब तसेच केंद्र शासनाची मान्यता असलेली सीमॅप या लॅबकडे पाठविला आहे. या दोघांनी सुगंधी तेल वापरण्यायोग्य असल्याचा दाखला दिला आहे.

सुरवातीस १०० रोपांची लागवड

आडे पाडले परिसरातील सुमारे १४ ते १५ शेतकऱ्यांनी पचौलीची लागवड आपल्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून केली. सुरवातीला लावलेल्या १०० रोपांची आजमितीस १ हजार रोपे झाली आहेत. परिसरातील ६ एकरामध्ये लागवड केली. ती १० एकरमध्ये करण्याचा मानस श्री भार्गवराम शेतकरी गट आडे-पाडले गटाचे सचिव वैभव लिमये यांनी व्यक्‍त केला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: किशोरी पेडणेकर ते नील सोमय्या... बीएमसी निवडणुकीत उमेदवारांच्या संपत्तीत मोठी वाढ, शपथपत्रांतून धक्कादायक आकडे उघड

CM Fadnavis: नॅशनल क्रश घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत; देवेंद्र फडणवीसांचा पुण्यात 'टॉक शो'

Latest Maharashtra News Updates Live: मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मेट्रोच्या कामाला मिळाली गती - मुरलीधर मोहोळ

Crime: नवऱ्याचे घनदाट केस आवडायचे; पत्नीने प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला अन् सगळे केसच हाती आले, नंतर... जे घडलं ते भयंकर

Raigad News : घातक कचऱ्यावरून खळबळ; पालीत वैद्यकीय कचरा व्यवस्थापनावर कडक निर्बंध!

SCROLL FOR NEXT