कोकण

#Specialtyofvillage घर बांधकामात दगड न वापरणारे गाव आकेरी हुमरस

भूषण आरोसकर

या गावात तुम्हाला दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही सापडणार नाही. माती आणि विटांची सुबक घरे हे इथले वैशिष्ट. या गावचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीदेव रामेश्‍वराचे मंदिर मात्र दगडातील वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराशी जोडलेल्या आख्ख्यायिकेमुळे गावात दगडाचे घर उभारले जात नाही. ही परंपरा कित्येक पिढ्या जपली आहे. सावंतवाडीपासून अवघ्या 6 किलोमीटरवर असलेले आकेरी-हुमरस (ता. कुडाळ). आकेरी आणि हुमरस ही आता दोन गावे म्हणून ओळखली जातात. त्यांच्या ग्रामपंचायती वेगळ्या आहेत. मात्र पूर्वी ही दोन्ही मिळून एकच गाव होते. आणि बांधकामात दगड न वापरण्याची परंपरा आजही या दोन गावात जपली जाते.

माणगावला जाणाऱ्या मार्गाशेजारीच श्री देव रामेश्‍वर मंदिराचे बांधकाम झाले. त्यावेळी मंदिराच्या बांधकामासाठी लागणारा दगड देवगडवरुन बैलगाडीतून आणला होता. श्री रामेश्‍वरावर आकेरीवासियांची मोठी नितांत श्रद्धा असून, आपला मंदीराचे बांधकाम दगडी असल्यामुळे देवापेक्षा मोठे कोणी असू नये, या विचारधारेने गावात कोणीही आपल्या घराला दगड वापरणार नाही असा शब्द मानकाऱ्यांनी मंदिरात देवासमोर दिला.

त्यानंतर ते आजतागायत गावात कोणीही स्थायिक झालेली व्यक्ती आपल्या वास्तूला दगड वापरत नाही. त्यामुळे गावातील सर्वच घरांचे बांधकाम विटांपासून झालेले आहे. अलिकडे स्लॅबची घरे बांधणारे सिमेंटच्या ब्लॉकचा वापर करतात. श्रीदेव रामेश्‍वराच्या तुलनेत कोणतीच गोष्ट मोठी असू नये. तसे करण्याची कोण प्रयत्न केल्यास त्याला गावात स्थिरता लाभत नाही, त्याची हानी होते अशा पुर्वापरापासून चालत आलेल्या आख्यायिकेनुसार आकेरी व हुमरसवासीय दगडी बांधकाम करत नाही.

गावात दगडी बांधकाम ज्यांनी प्रयत्न केले त्यांना तशी वेगळी प्रचिती किंवा वेगळेच अनुभव आले असल्याचा दावा ग्रामस्थ करतात. त्यामुळे दगडी घरे नसलेला गाव म्हणून आकेरी-हुमरसचा नावलौकिक सर्वदुर आहे. 

पूर्वी आकेरी व हुमरस हे कुडाळ तालुक्‍यातील एकच गाव होते; मात्र नंतर काही कारणास्तव आकेरी व हुमरस असे दोन भाग करण्यात आले. आकेरी गावची लोकसंख्या 3 हजाराच्या आत आहे. गावचे दोन भाग झाल्यानंतरही दोन्ही गावात देवाच्या दंतकथेनुसार दगडी बांधकाम करण्यास कोणीही तयार होत नाही. माणगावचे खोरे जवळच असल्यामुळे निसर्गाच्या कुशीत मुंबई-गोवा महामार्गावरच ही गावे आहेत. इथल्या स्थायिकांचा प्रमुख व्यावसाय शेती असल्यामुळे पावसाळ्यात गावाचे सौंदर्य विशेष खुलून दिसते. गावात सर्वाचीच घरे विटांची असल्यामुळे लगतच्या कोलगाव, आंबेगाव येथे वीट व्यवसाय जोरात चालतो. 

ग्रामस्थांची घरे दगडी नसली तरी गावातील शासकिय यंत्रणेची कार्यालये म्हणजे ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, प्राथमिक उपकेंद्रे आदीच्या बांधकामाला दगड वापरला गेला आहे. 

कोकणपण आजही टिकून 
गावात पूर्वापार स्थित असलेल्या नागरिकांना गावची दंतकथा माहिती असल्यामुळे कोणीही जाणून बुजून घरकामात दगड वापरण्याचे धाडस करत नाही. इतर गावातून येथे स्थायिक होण्यास कोणी आल्यास त्याला स्थानिक नागरिक गावची दंतकथा व श्रीदेव रामेश्‍वराच्या महती ते स्पष्ट करुन सांगतात. हे गाव शहरापासून जवळ आहे; मात्र दगडाचा वापर होत नसल्याने येथे निवासी संकुले किंवा फारसे सिमेंटीकरण झालेले नाही. यामुळे गावचे कोकणपण आजही टिकून आहे. 

गावावर श्री देव रामेश्‍वराची कृपा कायम आहे. गावात चालत आलेल्या दंतकथेनुसार आजपर्यत दगडी बांधकाम झालेले नाही. हे आमच्या गावचे विशेष आहे. आकेरी गावचा रथोत्सव एक मोठा उत्सव होतो. यावेळी गावच्या माहेरवाशिणी गावात येतात. रथोत्सव म्हणजे दसरा व दिवाळीसारखाच गावात उत्सव असतो.
- बाळकृष्ण राऊळ, ग्रामस्थ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT