रत्नागिरी : शिमगोत्सव साजरा करून परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांच्या एसटी बसला अपघात झाला. जिल्ह्यातील दापोली केळशी येथे उटंबर - मुंबई गाडीला सकाळी अपघात होऊन सुमारे 25 प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींना केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्यासाठी बस रस्त्याच्या खाली घेतल्याचे वाहन चालकाचे म्हणणे आहे. सदर वाहन चालकाने बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप लोकांनी केला आहे. तसेच अपघात झाल्याने ही बस केळशी येथे उभी करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जखमी प्रवासी व अन्य प्रवासी यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबईकडे जायला निघालेल्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. चालकाच्या बेजबाबदारपणामुळे अपघात झाला असल्याचा आरोप केला जात आहे. केळशी गावानजीक ही बस रस्त्याच्या खाली गेली. प्रवाश्यांनी आरडाओरडा केल्यामुळे केळशी गावातल्या लोकांनी धाव घेतली आणि तात्काळ जखमींना केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मोठा अनर्थ टळला !
बस अजून थोड्या दूर गेली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. कारण पुढे एका बाजूला भारजा नदी आहे. त्या नदीत बस पलटी झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु सुदैवाने ही बस अलीकडेच रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. बसमधील वाहक पसार झाला असून चालकाला मात्र जमावाने ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं आहे. पोलिसांना पाचारण करण्यात आले असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.