कोकण

सावंतवाडी स्वाभिमानचा वीज वितरणला घेराओ

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी - शहरात वीज वितरणच्या समस्यांबाबत येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अभियंता भालचंद्र कुलकर्णी यांना घेराओ घातला. कार्यालयाकडून ट्री कटिंगची अपेक्षित कामे झाले नाहीत. वीज बत्ती गुल होण्याचे प्रकार पहिल्या पावसातच सुरू झाले आहेत. मोठा पाऊस सुरू झाला तर आणखी समस्या निर्माण होणार आहेत. आताच या समस्या मार्गी न लावल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लवकरच उग्र आंदोलन छेडेल, असा इशारा स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी अभियंता कुलकर्णी यांना दिला.

नगरसेवक राजू बेग, सुधीर आडीवरेकर, दिलीप भालेकर, उदय नाईक, गुरू मठकर, अशोक सावंत, नेल्सन फर्नाडीस, बंड्या आरोलकर, गोट्या वाडकर, महेश पांचाळ, नागेश जगताप, अभी महाले उपस्थित होते.

पावसाळ्याच्या तोंडावरच शहरातील वीज व्यवस्थापन कोलमडून गेले आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी श्री. कुलकर्णी यांना घेराव घातला. वारंवार होणाऱ्या समस्या दूर करा, अन्यथा कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

तालुकाध्यक्ष परब यांच्या नेतृत्वाखाली घेराव घालण्यात आला. मागच्या वर्षी पावसाळ्यात वीज वितरणसाठी आंदोलन करण्यात आले होते. यावर्षी शहरात अनेक ठिकाणी ट्री कटिंगची कामे झाले नसल्याचे दिसून येत आहे. तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही ज्याठिकाणी ट्री कटिंग झाली नाही ती ठिकाणे दाखवतो. शहरात जे खांब उभारण्यात आले आहेत ते काम उभारताना कॉंग्रेसवर व दगड योग्य पद्धतीने घातले नाहीत, असा आरोप यावेळी नगरसेवक उदय नाईक यांनी केला.

अशा खांबांना कॉंक्रीट केल्याशिवाय त्यांचे बिल काढू नका, असे यावेळी गुरु मठकर यांनी सुचविले. सद्यस्थिती बघता नुकताच पाऊस सुरू झाला आहे तर एवढ्या समस्या निर्माण झाले आहेत पुढे मोठा पाऊस आला तर भंबेरी उडणार आहे. पहाटे पहाटे लाईट जाण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढू शकतात, असे यावेळी आडिवरेकर म्हणाले.

वीज वितरणला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होत नाही. अशा वेळी सर्वसामान्यांनी काय करावे, असा प्रश्‍न भालेकर यांनी उपस्थित केला. यावेळी श्री. परब म्हणाले, ""वीज बत्ती वारंवार गुल होण्यामुळे शहरातील असंख्य व्यापारी वर्गाला अनेक समस्या जाणवत आहेत. शहरातील वीज वितरणच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, अन्यथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT