कोकण

स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, "पिक्‍चर अभी बाकी है'

सकाळ वृत्तसेवा

मालवण - लोकसभा निवडणुकीनंतर स्वाभीमान पक्ष जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते; मात्र पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे हे येत्या दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतरच पुढील धोरण ठरेल. त्यांच्या भूमिकेनंतर या मतदार संघातील चित्र पालटलेले असेल. त्यामुळे "पिक्‍चर अभी बाकी है' असे "स्वाभिमान'चे जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

मी भाजपकडे तिकीट मागितलेले नाही; मात्र सोशल मिडीयावर जी चर्चा आहे त्यावर भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून कोणतेही वक्तव्य केले न गेल्याने त्यांचेही आपल्यावर प्रेम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या काळात राणेंच्या निर्णयाशी ठाम राहून ते जे आदेश देतील त्यानुसार एकनिष्ठ राहून काम करणार असल्याचेही श्री. सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

कुंभारमाठ येथे श्री. सामंत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी मंदार लुडबे, संदीप भोजने यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. ते म्हणाले, ""राज्यात युतीची सत्ता असली तरी जिल्ह्यात खासदार, पालकमंत्री, आमदार हे शिवसेनेचे आहेत. पाच वर्षात त्यांच्याकडून केवळ भूमिपूजने करण्यात आली. निवडणुकीत मतांवर डोळा ठेवून सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केले. देवबाग, तळाशील येथील बंधाऱ्याच्या कामासाठी निधीच्या घोषणा झाल्या. प्रत्यक्षात एक दगडही टाकण्यात आला नाही. परिणामी या पावसात देवबागवासियांना भीतीच्या छायेखाली राहावे लागले. लोकसभा निवडणुकीत खासदारांनी कामांचा लेखाजोगा मांडला आता तोच लेखाजोगा आमदार मांडतील. मात्र आता जिल्ह्यात परिवर्तनाची लाट आली असून राणे जो निर्णय देतील त्यानुसार काम करू.'' 

यापुढे पदाधिकारी, कार्यकर्ते राणेंसोबतच राहतील 
मतदार संघातील राणे समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते यापुढे कुठेही जाणार नाहीत. ते राणेंसोबतच राहतील, असा आपल्याला ठाम विश्‍वास आहे, असे श्री. सामंत यांनी सांगितले. दरम्यान, राणेंना सोडून जे गेले त्यांच्याविषयी बोलणार नाही; मात्र पालिका निवडणुकीत याच लोकप्रतिनिधींनी रामेश्‍वर मंदिरात पाषाणावरील नारळ घेत राणेंची साथ सोडणार नसल्याची शपथ घेतली होती. त्यांच्या जाण्याने पक्षाला कोणताही तोटा होणार नाही. ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांना नांदा सौख्य भरे. पक्षात त्यांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करावे असाच सल्ला असेल, असे ते म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT