this time all grampanyat election dominated by BJP in ratnagiri said bal mane 
कोकण

'सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असेल'

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिर : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संयुक्त दौरा सुरू आहे. शिवसेनेत अंतर्गत प्रचंड नाराजी आहे. नवीन आणि निष्ठावंत शिवसैनिक यांच्यातच निवडणूक सुरू आहे. स्थानिक आमदार आणि मंत्री यांच्या कार्यपद्धतीबाबत लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे दुखावलेल्या आणि नाराज शिवसैनिकांच्या मागे मी ठाम उभा आहे. ६० पैकी ५० ग्रामपंचायतीमध्ये मंत्र्यांविरोधात असंतोष असल्याने या वेळी सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य भाजपचे आणि ग्रामपंचायतींवर वर्चस्वही भाजपचे असेल असा दावा भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केला.   

भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सुरू असलेल्या गटातटाचे राजकारण शमविण्यात भाजपच्या वरिष्ठांना काहीसे यश आले आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने गट आणि आमदार प्रसाद लाड, विद्यमान जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन एकत्रित दिसले. ६ जानेवारीपासून त्यांनी संयुक्त दौरा सुरू केला. याबाबत बाळ माने म्हणाले, रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये भाजपला चांगले वातावरण आहे.

गावपातळीवर निष्ठावंत शिवसैनिक विरुद्ध नवे शिवसैनिक अशी लढाई सुरू आहे.६० पैकी ५० ग्रामपंचायतीमध्ये मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे. त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अनेकांनी पक्षाविरोधात दंड थोपटले आहेत. या नाराजांच्या मागे उभे राहून भाजप म्हणून आम्ही त्यांना ताकद देणार. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नक्कीच वेगळा असेल. 

विधानसभेला  मानेंना पहिली पसंती

बाळ माने किंवा आमच्यात कोणतेही गटातटाचे राजकारण नव्हते. आम्ही सर्व एकमेकांचे चांगले मित्र आहोत. त्यामुळे भविष्यातील विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीतून बाळ माने यांचे नाव एक नंबरला असेल, असे प्रसाद लाड यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील नवीन शिवसैनिक सोनिया गांधींचे आहेत; तर जुने शिवसैनिक बाळासाहेबांचे निष्ठावंत आहेत, असा टोला लाड यांनी लगावला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT