कोकण

गाळ काढण्यासाठी आंदोलनाची गरज काय

CD

rat०७११.txt

बातमी क्र..११ ( पान ५ मेन )

फोटो ओळी
-rat७p२५.jpg-
७३८५९
चिपळूण ः वाशिष्ठीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे.
---

गाळ काढण्यासाठी आंदोलन ही दिशाभूल

सतीश कदम ; बापू काणेंनी मोडली समितीची चौकट
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. ७ ः गेल्या दोन महिन्यांपासून कमी प्रमाणात का होईना वाशिष्ठीतील गाळ काढण्यास सुरवात झाली; मात्र मोठ्या प्रमाणात गाळ निघण्यासाठी चिपळूण बचाव समितीकडून पाहिजे त्या प्रमाणात यंत्रणेकडे पाठपुरावा केला जात नाही. समिती सदस्यांनाही विश्वासात घेतले जात नाही. गाळ काढण्यासाठी आता आंदोलनाची गरज नाही. चिपळूणकरांना गृहित धरून समितीने २६ जानेवारीला उपोषणाचा इशारा दिला आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असून समितीचे ज्येष्ठ बापू काणे यांनी चौकट मोडली. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय वास येतो असा आरोप समिती सदस्य सतीश कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.

चिपळुणात २२ जुलै २०२१ ला आलेल्या महापुरानंतर वाशिष्ठी व शिवनदीतीला गाळाचा मुद्दा ऐरणीवर आला. लोकांच्या उद्रेकातून चिपळूण बचाव समितीची स्थापना झाली. चिपळूणकरांच्या रेट्यामुळे गाळ काढण्यासाठी मोठी यंत्रणा कामास लागली; मात्र दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम मंद गतीने सुरू आहे. त्यातच मोडक समितीचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर बचाव समितीत फूट पडली. त्याचे पडसाद म्हणून सदस्य सतीश कदम यांनी पत्रकार परिषदेत काही मुद्दे मांडले. ते म्हणाले, यापूर्वी समितीच्या बैठका झाल्यानंतर निर्णय जाहीर केले जात होते. आता मात्र सदस्यांना विश्वासात न घेताच परस्पर निर्णय घेतले जातात. ज्येष्ठ सदस्य बापू काणे यांनी समितीची चौकट मोडली आहे. गाळ काढण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे नियमित पाठपुरावा केला जात नाही. सुरू असलेल्या कामाची नीट माहिती घेत नाहीत. चिपळूणकरांची दिशाभूल करून आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आंदोलन करण्यामागे राजकीय हेतुचा वास येत आहे. काढलेला गाळ टाकण्यासाठी शहरात जागा नाही. त्याचा समितीकडून पाठपुरावा केला जात नाही. केवळ चिपळूणकरांना गृहित धरून आंदोलनाची हाक दिली जाते. मूळ मुद्दा बाजूला ठेवून कोणाच्या फायद्यासाठी हे आंदोलन केले जाते, असा सवालही कदम यांनी उपस्थित केला.


समितीच्या काही गोष्टी पटत नाहीत

चिपळूण बचाव समितीसोबत सुरवातीपासून आपण कार्यरत होतो; मात्र गेल्या काही बैठकींना आपण अनुपस्थित राहिलो. समितीच्या काही गोष्टी न पटल्यानेच आपण ही भूमिका घेतली. त्यानंतर आता समितीने कोणालाही विश्वासात न घेता थेट आंदोलनाची भूमिका घेतल्याने नाइलाजास्तव भूमिका मांडावी लागली,असे कदम यानी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT