कोकण

बुरंबावडेत ‘जलजीवन’चा श्रीगणेशा

CD

86624
बुरंबावडे : येथील जलजीवन कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांनी केले.


बुरंबावडेत ‘जलजीवन’चा श्रीगणेशा

आमदार नाईकांची उपस्थिती; ९० लाखांचा निधी मंजूर

कणकवली, ता.३ : बुरंबावडे गावातील नळपाणी योजनेसाठी ९० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांनी आज केले. बुरंबावडे गावात नळयोजनेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख, उपनेते अरुण दुधवडकर यांनी पाठपुरावा केला. तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात कामासाठी ९० लाख रूपयांचा निधी मंजूर झाल्‍याची माहिती आमदार श्री.नाईक यांनी दिली.
दरम्‍यान, बुरंबावडे बौद्धवाडी येथे जिल्हा नियोजनच्या दलित वस्ती योजनेअंतर्गत हायमास्ट मंजूर झाला होता. या हायमास्टची उभारणीही पूर्ण झाली. याचेही उद्‌घाटन बुरंबावडे सरपंच अनुष्का शिंगे यांनी केले. यावेळी बुरंबावडे गावच्या वतीने शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर आणि आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी फणसगाव विभागप्रमुख दिनेश नारकर, बुरंबावडे सरपंच अनुष्का शिंगे, कणकवली युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, सिद्धेश राणे, प्रकाश आडिवरेकर, सत्यवान नार्वेकर, विजय आडिवरेकर, बबन पारकर, नामदेव पाटणकर, रामचंद्र साळवी, जगन्नाथ साळवी, सायली साळवी, सूर्यकांत साळवी, सूर्यकांत झगडे, रमेश राणम, काशीराम साळवी आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT