कोकण

शेतकऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास अपयश

CD

89229
जयेंद्र परुळेकर

शेतकऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे
प्रश्न सोडविण्यास अपयश

डॉ. परूळेकरांची सरकारवर टीका

सावंतवाडी, ता. १५ ः राज्यातील शेतकऱ्यांचे आणि शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी ठरताना दिसत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी केली.
परुळेकरांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचारी, परिचारिका, शिक्षक, शिक्षकेतर असे १८ लाख कर्मचारी आता बेमुदत संपावर आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी हा बेमुदत संप सुरू असून त्यामुळे राज्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य जनतेचे हाल होत आहेत. शाळा, रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, महसूल विभागासह इतर शासकीय कार्यालये या संपामुळे प्रभावित झाली आहेत. सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे सामान्य जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या काँग्रेस शासित राज्यांसह झारखंड आणि पंजाब या पांच बिगर भाजप शासित राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू आहे. मग देशातील सगळ्यात बलाढ्य अर्थव्यवस्था असणाऱ्या महाराष्ट्रात या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार का वेठीस धरत आहे? एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था उभारण्याची स्वप्ने दाखविणारे मुख्यमंत्री जुनी पेन्शन योजना का लागू करत नाहीत? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईमध्ये धडकत आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने मोठमोठ्या घोषणा आणि खोटी स्वप्ने दाखवण्याऐवजी शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचे मुद्दे सोडवावेत, हीच सामान्य जनतेची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT