कोकण

साखरपा ः महामार्ग चौपदरीकरण कामात कंपनीचा अतिरेक

CD

rat27p5.jpg
05331
साखरपाः बांधकाम तोडताना जेसीबी.

साखरपा परिसरात
घरांची तोडफोड
ना नोटीस ना माहिती; ग्रामस्थ संतप्त
साखरपा, ता. २७ः महामार्गाचे चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या नादात ठेकेदार कंपनीने साखरपा परिसरात अचानक घरांची तोडफोड सुरू केली आहे. मालकांना कोणतीही लेखी सूचना न देता पावसाळ्याच्या ऐन तोंडावर ही तोडफोड सुरू केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
सध्या रत्नागिरी-नागपूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे सुरवातीला रस्त्यांवरील मोठमोठी झाडे तोडण्याचे काम झाले. यानंतर टप्प्याटप्प्यात रूंदीकरण व रस्ताकटाई कामाला प्रारंभ झाला. यानंतर सध्या साखरपा गावात हायवेबाधित बांधकामे तोडण्यास अचानक प्रारंभ झाला आहे. कंपनीला २ वर्षे कामाची मुदत आहे म्हणून लवकरात लवकर घरे खाली करावीत, असे सांगण्यात आले आहे; मात्र या आधी कोणतीही सूचना किंवा नोटीस कोणालाही प्राप्त झाली नाही आहे. त्यामुळे अचानक पोलिस बंदोबस्तात सुरू झालेल्या या मोहिमेमुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अशा प्रकारे कंपनीच्या अरेरावी विरोधात स्थानिक नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे. ऐन पावसाळ्यात कुठे जायचे, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर आहे तसेच काही घरांना कुलूप असताना बांधकामे तोडली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT