Vashishti River esakal
कोकण

Koyna Dam : कोयनेचे पाणी थांबले, तर पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होईल; वाशिष्ठीचे पात्रही कोरडे

कोयना धरणातील (Koyna Dam) पाण्यावर वीजनिर्मिती झाल्यानंतर हे पाणी वाशिष्ठीच्या नदीपात्रात सोडले जाते.

सकाळ डिजिटल टीम

मार्चमध्ये कोयना वीजनिर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या वीजनिर्मितीवर मर्यादा आल्यानंतर वाशिष्ठीचे पात्र कोरडे पडते. त्या वेळी खेर्डीतील जॅकवेलमधून नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो.

चिपळूण : कोयना प्रकल्पातील (Koyna Project) वीजनिर्मितीवर मर्यादा आल्यामुळे वाशिष्ठी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे निम्म्या चिपळूण शहराला गोवळकोट खाडीच्या मचूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीपात्रात (Vashishti River) येणारे कोयनेचे अवजल कायमस्वरूपी बंद झाले तर चिपळूण शहराच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

कोयना धरणातील (Koyna Dam) पाण्यावर वीजनिर्मिती झाल्यानंतर हे पाणी वाशिष्ठीच्या नदीपात्रात सोडले जाते. या पाण्यावर चिपळूण शहर, उपनगर आणि एमआयडीसीतील कारखान्यांची गरज भागवली जाते. वाशिष्ठी नदीतील पाणी उचलण्यासाठी चिपळूण पालिकेने खेर्डी आणि गोवळकोट येथे जॅकवेल बांधले आहेत. खेर्डीतील जॅकवेलमधून येणाऱ्या पाण्याचा निम्म्या भागाला पुरवठा होतो.

गोवळकोट जॅकवेलमधून येणाऱ्या पाण्यातून निम्म्या शहराची तहान भागवली जाते. मार्चमध्ये कोयना वीजनिर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या वीजनिर्मितीवर मर्यादा आल्यानंतर वाशिष्ठीचे पात्र कोरडे पडते. त्या वेळी खेर्डीतील जॅकवेलमधून नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो; मात्र गोवळकोट येथील जॅकवेलमध्ये खाडीचे मचूळ पाणी येत असल्यामुळे तेच मचूळ पाणी नागरिकांना प्यावे लागते. मचूळ पाण्याच्या समस्येवर आठ दिवसात मार्ग काढण्याचे आश्वासन पालिकेने दिले आहे. वाशिष्ठी नदीला पाणीच नसेल तर मचूळ पाण्याच्या प्रश्नावर पालिका मार्ग कसा काढणार, याकडे लक्ष आहे.

कोयनेचे महत्त्व अधोरेखित

पावसाळ्यात वाशिष्ठी नदीला पूर आला, तर कोयनेच्या पाण्यावर खापर फोडले जाते. कोळकेवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे चिपळूण शहरात पाणी भरल्याचा आरोप केला जातो. वास्तविक कोयनेच्या पाण्यावरच शहरातील नागरिकांना उपनगरातील ग्रामस्थांना आणि खेर्डी, खडपोली, लोटेतील कारखानदारांना पाणी पुरवले जाते. एमआयडीसीतील कारखानदार आणि नागरिकांना वाशिष्ठीचे पाणी वगळता इतर पर्याय नाही. त्यामुळे वाशिष्ठेच्या पात्रात येणाऱ्या कोयनेच्या पाण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

जलसंपदा विभागाशी आमचा पत्रव्यवहार सुरू आहे. नदीपात्रात किमान चार तास पाणी असावे, अशी सूचना आम्ही त्यांना केली आहे. गोवळकोट जॅकवेलला जोडलेली पाईपलाईन खेर्डी जॅकवेलला जोडली, तर सर्वच भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नदीपात्रात पाणी असणे हे गरजेचे आहे. कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी पात्रात पाणी सोडण्याची मागणी आम्ही जलसंपदा विभागाकडे केली आहे.

-नागेश पेठे, पाणीपुरवठा विभाग, चिपळूण पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT