कोकण

काँग्रेसने ८० वेळा संविधान बदलले

CD

३० (पान ३ साठी)
-----------

काँग्रेसकडून संविधानात ८० वेळा बदल

विनोद तावडे ः सहानुभूतीचा फायदा होणार नाही

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आपल्या काळात ८० वेळा संविधान बदलले. संविधानात बदल करण्याचे भाजपच्या सुतराम डोक्यात नाही; परंतु संविधान बदलण्यावर काँग्रेसने बोलूच नये, असा पलटवार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सहानुभूतीचा कोणालाही फायदा होणार नाही. लोकांना विकास हवा आहे तो मोदींच्या काळात झाला असल्याचे सांगितले.
तावडे म्हणाले, भाजप आणि मोदी सरकारने संविधान दिवस साजरा करण्यास सुरवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी संविधानाची प्रत समोर ठेवून भाजपाने संकल्पपत्र घोषित केले. संविधानात बदल करण्याचे भाजपाच्या सुतराम डोक्यात नाही; मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवारच अशा प्रकारची भाषा करत आहेत. करवाटपात महाराष्ट्राला मिळालेला अधिकचा वाटा, अनुदानात मिळालेली अधिकची रक्कम ११ हजार ७११ कोटी रुपये बिनव्याजी कर्ज केंद्राने महाराष्ट्राला दिले.
काँग्रेस एका बाजूला रोजगार नाही, असे म्हणत आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपाने पंतप्रधान आवास योजनेतून ४ कोटी घरे बांधली. ही घरे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खिशातून बांधली नाहीत. त्यासाठी लागलेल्या साहित्यात हजारो व लाखो लोकांना रोजगार मिळाला. पीएम आवासमध्ये २७ लाख घरे महाराष्ट्राला दिली, शौचालय बांधली आहेत. आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड दिले आहे, अन्नधान्य दिले जात आहे, असे तावडे यांनी सांगितले.
--------
खालच्या पातळीवरील प्रचार वेदनादायी

पहिल्या टप्प्यात भाजपला अपेक्षित मतदान झाले आहे. आम्ही चांगल्या जागा मिळवू. लोकसभेचा राज्यात जो प्रचार सुरू आहे तो राज्याच्या हितासाठी अपेक्षित नाही. कोण नाच्या म्हणतो, कोणी काही म्हणतो हे शोभनीय नाही, अशा राजकीय स्तरावर जाऊन प्रचार करणे मनाला वेदना देणारे आहे, अशी खंत विनोद तावडे यांनी बोलून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT