कोकण

-वाघांबरोबरच वानर, माकडांची होणार गणना

CD

३० (पान ३ साठी, अॅंकर)

वाघांबरोबरच वानर, माकडांची होणार गणना

वनविभागाचा पुढाकार ; निर्बिजीकरण करण्याच्या हालचाली

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : जिल्ह्यात वनविभागाची व्याघ्र गणना गुरूवारपासून (ता. २३) सुरू होणार आहे. जिल्ह्यातील पाणवठ्यावर प्रत्यक्ष जाऊन ही गणना केली जणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात किती बिबटे, ब्लॅक पॅंथर आहेत याचा अंदाज वनविभागाला येणार आहे. त्याचबरोबर वानर, माकडांचीही गणना होणार आहे. त्यानंतर त्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार सुमारे आठ ते दहा किमी अंतरावर एक बिबट्या असावा, असा अंदाज आहे. बिबट्यांचा अधिवास धोक्यात आल्यामुळे मानवी वस्तीमध्ये त्यांचा वावर दिसतो. भक्ष्याच्या शोधात ते मानवी वस्तीपर्यंत पोहचले आहेत. जिल्ह्यात आता किती बिबटे आहेत याची गणना व्याघ्र गणनेमध्ये होणार आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातून अनेक वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात लांजा, देवरूख, राजापूर आदी भागात पायथ्याशी उतरत आहे. समूहशेतीचा उपक्रम अनेक गरजूंनी सुरू केला आहे. त्यामुळे या भागात हे वन्यप्राणी मोठ्या संख्येने येतात. त्याबाबत वनविभागाकडे काही शेतकऱ्यांनी तक्रारीही केल्या आहेत. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान हे वन्यप्राणी करत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून वानर, माकडांचा मोठा उपद्रव शेतकऱ्यांना होत आहे. त्यांची टोळी शेतात, बागायतीची नासधूस करते. त्यांना पकडण्याच्यादृष्टीने वनविभागाने पावले टाकली आहेत. सुरवातीला या वानर किंवा माकडांची गणना केली जाणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला देऊन त्यांना पकडून निर्बिजीकरण करण्याचा प्रयत्न वनविभागाचा आहे. वनाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT