कोकण

चांदेराई बाजारपेठेवर पुराचे सावट कायम

CD

-rat८p६४.jpg-
P२४M९५७३०
रत्नागिरी ः चांदेराईत बाजारपेठेत रात्रभर पुराचे पाणी स्थिर होते.
-------------
चांदेराई बाजारपेठेवर पुराचे सावट कायम

गाळ काढूनही काजळी नदीला पूर ; बाजारपेठ पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः मुसळधार पाऊस आणि भरती यामुळे काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठ शिरले. मध्यरात्रीपर्यंत बाजारपेठेतील सुमारे शंभरहून अधिक दुकाने पुराच्या पाण्यात होती. सुमारे सात तासाहून अधिक काळ पुराचे पाणी स्थिर होते. काजळी नदीपात्रातील गाळ काढूनही पुराचे सावट कायम राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आंबाघाटातून वाहत आलेल्या काजळी नदीचे पात्र दिवसेंदिवस गाळाने भरून चालले होते. हा गाळ काढला तर बाजारपेठ दरवर्षीच्या पुराच्या संकटातून मुक्त होईल यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी २५ लाख रुपयांची तरतूद जिल्हा नियोजनमधून करून दिली होती. गाळ काढण्याचे काम पाटबंधारेच्या अलोरे येथील तांत्रिक विभागाकडे देण्यात आले होते. नदीपात्रातील काढलेला गाळ किनाऱ्यावर रचून ठेवण्यात आला. हे काम पूर्ण झाल्यामुळे चांदेराई बाजारपेठ पूरमुक्त होईल, अशी आशा होती; मात्र गेले चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने रविवारी (ता. ७) सायंकाळी काजळी नदीला पूर आला. पुराचे पाणी वेगाने चांदेराई बाजारपेठेत शिरू लागले. पुराचे पाणी बाजारपेठेत शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन दुकानदारांनी साहित्य सुरक्षित ठिकाणी नेण्यात सुरवात केली. सायंकाळी ७ वाजल्यानंतर पुराचे पाणी रस्त्यापर्यंत पोचले. रस्त्यावर सुमारे तीन फूट पाणी होते. त्यामुळे हरचेरीमार्गे लांजाकडे जाणारा रस्ता बंद होता. मध्यरात्री १ वाजेपर्यंत ओहोटी लागेपर्यंत पाणी स्थिर होते. त्यानंतर हळूहळू पाणी ओसरू लागले. सुमारे सहा तासाहून अधिक काळ बाजारपेठेत पाणी होते.

कोट
नदीपात्रातील दहा मीटर खोलीचा गाळ काढणे आवश्यक आहे तरच चांदेराई बाजारपेठेची पुरापासून मुक्तता होईल तसेच काढलेला गाळ पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्याला प्रशासनच जबाबदार आहे. कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्याची आवश्यक आहे.

- दादा दळी, माजी सरपंच, चांदेराई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Duleep Trophy Final : 4,4,W,4,W! CSK च्या गोलंदाजाचं मजेशीर षटक; पण, RCB च्या रजत पाटीदारच्या संघाला जेतेपद

Latest Marathi News Updates : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, करमाळ्यातील कोर्टी गाव पाण्याखाली

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

SCROLL FOR NEXT