कोकण

-राजापूर ग्रामीण रुग्णालयातील मुख्य पदे रिक्त

CD

-rat१८p३३.jpg-
P२५N६४६९१
राजापूर ः राजापूर ग्रामीण रुग्णालय
-----
राजापूर ग्रामीण रुग्णालयातील पदे रिक्त
वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग तज्ज्ञ नाहीत ; कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजापूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार आणि आरोग्यविषयक सोयीसुविधी देणारी महत्वाची वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकीत्सक आणि स्त्री रोग तज्ज्ञ यांसह कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे राजापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये तालुक्यातील सुमारे दीड लाख लोकसंख्येचे आरोग्य सांभाळले जाणार कसे० असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
गेली अनेक वर्षे राजापूर हायस्कूलसमोरच्या जागेमध्ये राजापूर ग्रामीण रुग्णालय कार्यरत होते. त्यानंतर १७ वर्षापूर्वी सुसज्ज नवीन इमारत बांधल्यानंतर या नव्या इमारतीमध्ये राजापूर ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित झाले. या नव्या इमारतीमध्ये दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात अशी सुर्वसामान्यांची अपेक्षा आहे. वर्षानुवर्षे राहिलेल्या रिक्त जागांमुळे हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी असून नसल्यासारखे राहीले आहे. रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी व अन्य विविध संवर्गातील एकूण २८ पदे मंजूर आहे. त्यापैकी केवळ २१ पदे भरलेली असून ७ पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षकांव्यतिरीक्त एक वैद्यकीय अधिकारीपद भरलेले आहे. भरण्यात आलेले वैद्यकीय अधिकारीपद हे तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे अकरा महिन्यांच्या करारावर भरलेले आहे. याचबरोबर कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, सफाई कामगार, दंत चिकित्सक वर्ग-२ ही पदे गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत. या रुग्णालयामध्ये दैनंदिन सुमारे १०० हून अधिक बाह्य रुग्ण तपासले जातात. त्याचवेळी उपचारासाठी दाखल होणाऱ्‍या रुग्णांची संख्याही मोठी आहे. वैद्यकीय अधिकारी पदासह अन्य विविध कर्मचारी पदे रिक्त आहेत.
----
एमबीबीएस डॉक्टरही करारावर
एखाद्या रुग्णावरील महत्वपूर्ण शस्त्रक्रिया, शवविच्छेदन करणे, सर्पदंशचे निदान आदींसाठी रुग्णालयामध्ये एमबीबीएस डॉक्टरची आवश्यकता असते. रुग्णालयामध्ये एमबीबीएस डॉक्टरांची आवश्यकता असताना वैद्यकीय अधीक्षकांव्यतिरीक्त भरण्यात आलेले एमबीबीएस डॉक्टरचे पद तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे अकरा महिन्यांच्या करारावर भरण्यात आले आहे. या ठिकाणी विविध आजारांसह अपघातग्रस्त रुग्ण सातत्याने दाखल होत असतात. पावसाळी हंगामामध्ये संर्पदंशाच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रुग्णालयामध्ये एमबीबीएस डॉक्टरांच्या पदांची तत्काळ भरण्यात यावीत अशी अपेक्षा केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT