अवघे अडीच हजार मेट्रिक टन खत दाखल
ऐन हंगामात तुटवडा जाणवणार ; युरियाची एकमेव रेक प्राप्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २०ः खरीप हंगामासाठी जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे एकूण १२ हजार ९०९ मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे; मात्र, आतापर्यंत युरियाची एकमेव रेक आली असून, २५६१ मेट्रिक टन खताची आवक झाली आहे. त्यामुळे ऐन हंगामात खताचा तुटवडा होण्याची शक्यता आहे.
युरिया खताचा वापर सर्वाधिक होत असला तरी एमओपी, डीएपी, संयुक्त खते, एसएसपीसारख्या खतालाही शेतकऱ्यांकडून मागणी असते. जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. नाचणीची १२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. खरीप हंगामात ८० हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असते. जिल्ह्यात भात, नाचणी, भाजीपाला पिके घेण्यात येत असून, पेरणी, लागवड व लागवडीनंतर खताची मात्रा पिकाला देण्यात येत असल्याने खतांना मागणी आहे.
यावर्षी मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्यासारखे वातावरण आहे शिवाय आंबा संपल्याने बागायतदारांनी कलमांची साफसफाई, खते देण्यासाठी अळी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यावर्षी उष्मा भरपूर असल्यामुळे शेतकरी शक्यतो मिश्रखतांचा वापर करू लागले आहेत. मंजूर खतसाठ्यापैकी २,५६१ मेट्रिक टन खत आले असून, उर्वरित खत टप्प्याटप्प्याने येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी कृषी विभागातर्फे ७ हजार ४२४ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे; मात्र अद्याप ३८१ क्विंटल भातबियाणे उपलब्ध झाले आहे. पेरणीपूर्व बियाणांची उपलब्धता शेतकऱ्यांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.