कोकण

शेतकऱ्यांनी भात पेरणीची घाई करू नये

CD

शेतकऱ्यांनी भातपेरणीची घाई करू नये
शिवकुमार सदाफुले ः ऊन पडल्यानंतर पेरणी करा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः जिल्ह्यात २१ मे पासून सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पूर्वमोसमी पाऊस सुरू आहे. यापूर्वी मे महिन्यात एवढा पाऊस कधीही पडलेला नाही. पेरणी साधारणपणे जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात होत असते. त्यामुळे पेरणीचा हंगामही गेलेला नाही. पाऊस सतत पडत असल्यामुळे पेरणी पुढे केली तरीही चालणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन दिवस पेरणी करू नये. यापुढे पाच दिवसांनी पाऊस थांबल्यानंतर ऊन पडले तर भातपेरणी करणे सोईस्कर होईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
गेले दहा दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे भातशेतीच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४६८.२ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. नद्या, नाले भरून वाहत आहेत. खरीप हंगामासाठी हे वातावरण पोषक नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे भातशेतीची कामे करताना काळजी घेण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहेत तसेच पाणथळ जमिनीत गरवी बियाण्यांची पेरणी लवकर करू नये, असे कोकण कृषी विद्यापिठाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पुढील नियोजन करावयाचे आहे. पूर्वमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा जेणेकरून कृषी, महसूल व ग्रामविकास खाते यांच्याकडून होणारे संयुक्त पंचनामे होणे सोयीचे होईल. अॅग्रीस्टॅक योजनेमध्ये जिल्ह्यातील सर्व खातेदारांनी शेतकरी नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्यांची नोंदणी प्रलंबित आहे अशा सर्व खातेदारांनी ३१ मे पूर्वी अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी पूर्ण करून घ्यावी. तसे न केल्याच पीएम किसान योजनेतील २०वा हप्ता वितरित केला जाणार नाही, असे निर्देश दिले आहेत. नोंदणी करण्यासाठी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
----
अशी करा भातपेरणी
आजच्या परिस्थितीत भातपेरणी करायची असल्यास वरकस जमिनीवर नांगरणी करून गरव्या भातवाणांची उंच गादीवाफे तयार करून पेरणी करावी. पुढेही पाऊस असाच राहिला तर भातबियाणे १२ तास कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवावे. त्यानंतर पाण्यातून काढून गोणपाटामध्ये २४ तास बांधून ठेवावे. गोणत्याच्या चारही बाजूंनी भाताचा सुका पेंढा अंथरावा. अशा पद्धतीने २४ तास झाल्यानंतर भातबियाण्याला कोंब आल्यावर हे बियाणे गादीवाफ्यावर पेरणी करावी. दोन ओळींमध्ये साधारणपणे १० ते १५ सेमी अंतर राखावे, असे शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde यांच्या बंगल्यावर मोठी खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांना तंबी, काय निर्णय घेणार?

India Ultimatum Pakistan: ‘..तर परिणाम वाईट असतील' ; चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा अल्टिमेट!

Manoj Jarange Patil: जरांगे-सरनाईक भेटीत काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? स्पष्ट सांगितलं

Manchar News : साकारमाच-आहुपे गाव पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Supreme Court: मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख लोकांचे नावं जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT