कोकण

ःनियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर कारवाई

CD

‘त्या’ कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर कारवाई
तक्रार निवारण समिती स्थापन : ५१९१ क्विंटल बियाणे आवश्यक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास तक्रार निवारण समितीकडे किंवाह जिल्हास्तरावरील तक्रार निवारण हेल्पलाईन क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन करीत नियमांचे उल्लंघन केल्यास कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर थेट कारवाईचा इशारा कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२६ करिता बियाणे, खते व किटकनाशके या कृषी निविष्ठांचा दर्जेदार तसेच सुरळीत व वेळेवर मुबलक पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरु आहेत. गुणवत्ता नियंत्रणाकरिता जिल्हास्तरावर व प्रत्येक तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन केली आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी हे पथक प्रमुख आहेत. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, रत्नागिरी हे सदस्य सचिव आहेत आणि तालुकास्तरीय भरारी पथकाचे तालुका कृषी अधिकारी हे पथक प्रमुख असून पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र अशी तक्रार निवराण समितीची स्थापना केली आहे. खरीप हंगाम २०२५-२६ साठी रत्नागिरी जिल्ह्यातील ५६०१० हेक्टर क्षेत्रासाठी एकूण ५१९१ क्विंटल बियाणे आवश्यक असून खतांचे एकूण १२ हजार ९०७ मे. टन एवढे मंजूर आवंटन आहे.
----
कोट
खरीप हंगाम तोंडावर असून खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे व खते पुरवठा सुरु झालेला आहे. नुकतीच निविष्ठा विक्रेत्यांची बैठक झाली असून चुकीच्या पद्धतीने कृषी निविष्ठा करणारे विक्रेते रडारवर असतील, कोणत्याही अवैध व्यवहाराला पाठीशी घातले जाणार नाही. शेतकऱ्यांना बनावट बियाण, बनावट खते अथवा बनावट किटकनाशके विकणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करुन त्यांचे परवाने निलंबित करण्यात येतील
- शिवकुमार सदाफुले, जिल्हा कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : तरुणांना १५ हजार रुपये मिळणार....पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा...काय आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना?

Independence Day: दिवाळीत मोदी देशाला देणार मोठे गिफ्ट, GST बद्दल केली मोठी घोषणा, करात मिळणार दिलासा

PM Narendra Modi Speech Live Update : राष्ट्रीय सुरक्षा कवच २०३५ पर्यंत आणखी मजबूत करणार- पंतप्रधान मोदी

Independence Day 2025 PM Modi : अणुधमक्यांना घाबरणार नाही, ब्लॅकमेल केलं तर...; मोदींचा लाल किल्ल्यावरून असीम मुनीरला इशारा!

Independence Day 2025 : आता मेड इन इंडिया 'सेमीकंडक्टर' चिप बाजारात येणार, पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन 'आत्मनिर्भर'ची गर्जना

SCROLL FOR NEXT